शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

५५ हजारांवर विद्यार्थी वंचित

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

बीड : ग्रामीण भागातील अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी केंद्र शासनाने शिष्यवृत्ती देऊ केली होती.यामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ९३ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे

बीड : ग्रामीण भागातील अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी केंद्र शासनाने शिष्यवृत्ती देऊ केली होती.यामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ९३ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. नोंदणी मात्र ६० हजार ७७ विद्यार्थ्यांची झाली होती.२०१३-१४ या शैक्षणिक सत्रात केंद्र शासनाच्या वतीने ‘आम आदमी’ शिष्यवृत्ती देऊ केली होती. ग्रामीण भागातील अल्प भूधारक व पाच एकर जिरायती तसेच अडीच एकर बागायती असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने आम आदमी शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे़ यासाठी बीड जिल्हयात संजय गांधी निराधार योजना विभागाला ६० हजार विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करत संजय गांधी निराधार विभागाने ६० हजार ७७ विद्यार्थ्यांची नोंदणी केली व केंद्र शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी केली़ यामध्ये जिल्ह्यातील ६६२ शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली होती़आम आदमी शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे राज्यात सर्वात जास्त काम बीड जिल्हयात झाले होते़ मात्र झालेल्या एकूण नोंदणी पैकी अत्यल्प विद्यार्थ्यांना आम आदमी शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याचे प्राप्त अहवालानुसार निदर्शनास आले आहे़ प्राप्त अहवालानुसार बीड तालुक्यातील ७ हजार ५९९, पाटोदा-३४२१, आष्टी- ६३००, शिरूर- ४१०६, गेवराई- ५७६१, वडवणी- २६००, अंबाजोगाई- ५३००, परळी- ४८८३, माजलगाव-४३२५, धारूर- २४२५ व केज-७५०० विद्यार्थ्यांची आम आदमी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली होती़ याबाबत संजय गांधी निराधार विभागातील कर्मचारी भरत भंडाले यांनी सांगितले की, काही डाटस एंन्ट्री च्या सिस्टिममध्ये बाराशे रूपये दिले जातात वर्षाकाठीग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून आम आदमी शिष्यवृत्ती अंतर्गत शंभर रूपये महिन्याला देण्याची योजना आहे़ मात्र साठ हजारातील केवळ पाच हजार ९३ विद्यार्थ्यांनाच लाभ मिळालेला आहे़ (प्रतिनिधी)गोरगरिबांच्या मुलांची थट्टाकेंद्र सरकारने मोठ्या उदात्त हेतूने आम आदमी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. मात्र बीड जिल्ह्यातील ५५ हजाराहून अधिक विद्यार्थी या योजनांपासून वंचितच आहेत. जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या मोठी आहे, अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलांनाच मिळायला हवा. परंतु प्रशासनाने विद्यार्थ्यांची केवळ नोंदणी करून घेतली आहे. त्यांना शिष्यवृत्ती मिळालीच नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांची ही थट्टा असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हा प्रमुख शैलेश जाधव यांनी केला. शिष्यवृत्ती तात्काळ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.