शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उर्दूच्या प्रश्नपत्रिकेत ५४ चुका!

By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्रता सिद्ध करणारी ‘टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) रविवारी शहरातील एकूण ४२ केंद्रांवर घेण्यात आली.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्रता सिद्ध करणारी ‘टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) रविवारी शहरातील एकूण ४२ केंद्रांवर घेण्यात आली. १८ हजार ६३९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली; परंतु उर्दू माध्यमाच्या छापील प्रश्नपत्रिका न देता हस्तलिखिताच्या स्वरूपात देण्यात आल्या. त्यात तब्बल ५४ चुका असल्याचे लक्षात आल्याने गोंधळ उडाला. परीक्षा परिषदेने उर्दू भाषा माध्यमांच्या प्रश्नपत्रिका डीटीपी करून छापील स्वरूपात तयार केल्या नव्हत्या, तर हस्तलिखिताच्या झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यात चुकाच चुका असल्याने परीक्षार्थी गोंधळून गेले. या सर्व प्रकाराचा उर्दू शिक्षक संघटनेने निषेध नोंदविला. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शेख मोईनोद्दीन नजिरोद्दीन यांनी सांगितले की, राज्य परीक्षा परिषदेची उर्दू भाषेविषयीची अनास्थाच यातून स्पष्ट झाली आहे. डीटीपी स्वरूपातील छापील प्रश्नपत्रिका देण्याचे नियोजनही परीक्षा परिषद करू शकली नाही, त्यामुळे परिषदेने यापुढे उर्दू माध्यमाची परीक्षाच घेऊ नये, याविषयीची तक्रार आपण आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले की, शहरातील ४२ केंद्रांवर रविवारी (दि.१४) टीईटी घेण्यात आली. ही परीक्षा शांततेत पार पडली असून त्यात सकाळच्या सत्रात ३३ केंद्रांवर पहिला पेपर झाला. त्यासाठी १२ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते; परंतु प्रत्यक्षात ११ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.