बीड : जिल्ह्यात ५१ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. त्यामुळे आता नवीन छावण्यांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी स्पष्ट केले.जिल्ह्यात लहान-मोठया जनावरांची संख्या ८ लाख २२ हजार ३६४ असून जनावरांना दररोज ७ हजार ८८२ मे. टन चारा लागतो. खरीप हंगामात इतर मार्गानी जिल्हयात ४ लाख ४ हजार ९२२ मे. टन चारा उपलब्ध असून, हा चारा जिल्हयातील जनावरांना ५१ दिवस पुरेल इतका आहे.चारा छावण्या सुरु करण्याच्या निर्णयानूसार ५० चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी ४ छावण्या सुरु आहेत. त्यापैकी निकषाप्रमाणे ३ छावण्या सुरु असून सुरु होऊन बंद झालेल्या छावण्यांची संख्या ६ आहे. यामुळे चारा छावण्यांची गरज नसल्याचे निदर्शनास आल्यानुसार प्रशासनाने नवीन चारा छावण्या मंजूर न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. (प्रतिनिधी)
५१ दिवसांचा चारा उपलब्ध
By admin | Updated: September 29, 2015 00:46 IST