शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापोटी जिल्ह्याला मिळणार ५०० कोटी रुपये...

By admin | Updated: January 20, 2017 00:19 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी रबी २०१५ व खरीप २०१६ पीकविम्यापासून वंचित होते.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी रबी २०१५ व खरीप २०१६ पीकविम्यापासून वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते. या सर्व पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा केल्याने जिल्हाभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे सुमारे पाचशे कोटी रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.शेतकऱ्यांना रबी हंगामाचा (२०१५) पीकविमा दिवाळीपूर्वी मिळावा यासाठी राज्य शासनाने आकस्मिक निधीमध्ये राज्याच्या वाट्याच्या रकमेची आगाऊ तरतूद करून ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री, कृषी मंत्री, प्रधान सचिव व अप्पर मुख्य सचिव कृषी-वित्त विभाग यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु, शासनाने तशी कार्यवाही केली नव्हती. अखेर हिवाळी अधिवेशनामधील पुरवणी मागण्यांमध्ये यासाठी तरतूद करण्यात आली. परंतु, ३० दिवस लोटूनही प्रत्यक्षात याबाबतचा शासन निर्णय निघालेला नव्हता. त्यामुळे १२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यानंतर कुठे राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना रबी हंगाम २०१५-१६ अंतर्गत शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसानभरपाईसाठी ४०७.९४ कोटी भारतीय कृषी विमा कंपनीस मंजूर करणेबाबतचा शासन निर्णय १८ रोजी निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम-२०१६ मध्ये जिल्हाभरातील ३ लाख ८ हजार ६०३ शेतकऱ्यांनी पिके विमा संरक्षित केली होती. विमा हप्त्यापोटी २८.५८ लाख रूपये भरले होते. पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिली. परिणामी उत्पादकतेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट आली. त्यामुळे नवीन पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची २५ टक्के रक्कम आगाऊ मिळणे अपेक्षित होते. परंतु, ही रक्कम मिळाली नाही. ही रक्कम मिळावी म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने पाठपुरवा केला असता राज्य शासनाने खरीप हंगाम-२०१६ साठी पीक विमा हप्ता अनुदानाची रक्कम ८५३.८० कोटी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस अदा करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यामुळे खरीप आणि रबी पीक विम्यापोटीचे शासनाने १२६१.७४ कोटीचा हिस्सा विमा कंपनीकडे अदा करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे रबी २०१५ व खरीप-२०१६ पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ५०० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उर्वरित सहाशे कोटी रूपये तातडीने द्यावेत, अशी मागणी आ. पाटील यांनी केली आहे.