शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

५० टक्के कर्मचारी उपस्थिती फक्त नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या शासन आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. मार्च ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या शासन आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. मार्च एंड असल्यामुळे जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याचे दिसते आहे. ५० टक्के कर्मचारी उपस्थिती नावालाच आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालये मिळून १२२७ कर्मचारी कामावर आहेत. ते सगळे बुधवारी कामावर हजर होते. वसुली, परवानग्या, नोंदण्या या सगळ्यांच्या टार्गेटसाठी सर्व कर्मचारी कामावर आहेत.

जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. शहर रात्री ८ वाजताच बंद होत आहे. शासकीय कार्यालये निर्धारित वेळेत सुरू होत असली तरी मार्च अखेरमुळे जिल्हाधिकारी कार्यालय, मुद्रांक कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी कमी होण्यास तयार नाही.

अँटिजेन टेस्ट प्रवेशद्वारावरच केली जात आहे. रोज ४ ते ५ नागरिक चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सुरुवातीला अभ्यागतांसाठी चाचणी बंधनकारक केल्यामुळे कार्यालयात येणाऱ्यांची संख्या रोडावली होती; परंतु नागरिकांनी वेगवेगळ्या मार्गांनी कार्यालयात प्रवेश मिळवीत त्या चाचणीला देखील फाटा दिला. विनाकारण कार्यालय आवारात फिरणाऱ्यांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येते.

कोरोनाचे एकूण रुग्ण ७०५५१

बरे झालेले रुग्ण ५६१३८

उपचार सुरू असलेले रुग्ण १२९४९

कोरोनाचे बळी १४६४

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या २० शाखा आहेत. मार्च अखेरमुळे या शाखांच्या बेबाकीची गरज अनेकांना असते. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवेशद्वारावरच अँटिजेन टेस्ट करण्यात येत असली तरी ती टेस्ट अभ्यागतांची होत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नाही. बुधवारी कार्यालयात जवळपास सर्व कर्मचारी कामावर होते.

जिल्हा मुद्रांक कार्यालय

३१ मार्चपूर्वी दस्त नोंदणी केल्यास सवलत मिळणार आहे. त्यासाठी मुद्रांक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असले तरी गर्दी कमी होत नाही. कार्यालयातील सहा कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. ऑनलाईन प्रक्रिया करून घेण्याऐवजी दस्तनोंदणीसाठी प्रत्येक जण कार्यालयातच येत आहे. मुद्रांक विभागात ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर गर्दीचा ताण पडतो आहे.

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेतील तीन मोठे विभाग स्थलांतरित झाले आहेत. अर्थसंकल्प तयारीनिमित्त सर्व कर्मचारी कामावर होते. प्रवेशद्वारावरच अँटिजेन चाचणी होत असल्यामुळे काम असलेले नागरिकच जि. प. आवारात होते. परिषदेच्या आवारात असलेले सर्व विभाग नियमित सुरू होते. कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के होती. निवृत्तिवेतन, बँकेचे व्यवहार, कंत्राटदारांची देणी, यासाठी येणाऱ्यांची कार्यालयात गर्दी होती.

कार्यालयात गर्दी कशासाठी ?

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दोन तहसील, एक उपविभागीय आणि मुद्रांक विभागाचे कार्यालय आहे. सेतू कार्यालय आहे. १२०० च्या आसपास कर्मचाऱ्यांची संख्या या कार्यालय आवारात आहे. यापेक्षा पाचपट नागरिकांची गर्दी परिसरात दिसते आहे. मुद्रांक नोंदणीसाठी, सेतूमधून सामाजिक उपयोगांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी, तहसीलमध्ये सुनावणी व इतर कर भरण्यासाठी, उपविभागीय कार्यालयात सुनावणीसाठी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात परवाना शुल्क आणि भूमापन कार्यालयात नागरिक गर्दी करीत आहेत.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

मार्च अखेर आहे. तसेच तीन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे सरकारी दप्तरी असलेली कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले.

ज्ञानेश्वर डांगे, मुकुंदवाडी

मुद्रांक विभागात नोंदणीसाठी सवलत आहे. त्यामुळे दस्त नोंदणी ३१ मार्चपूर्वी करण्यासाठी कार्यालयात यावे लागले. ऑनलाईन प्रक्रियेत नेटवर्कच्या अडचणी आल्याने येथे आलो.

गणेश गांगवे, एन-१, टाऊन सेंटर

निवृत्तिवेतन संबंधातील काही कागदपत्रे विभागात जमा करण्यासाठी आलो होतो. बँकेतही काम होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत यावे लागले.

शांताराम पाटील, सिल्लोड