शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग लॉकडाऊनमध्ये प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST

विजय सरवदे औरंगाबाद : दीड महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग प्रभावित झाले असून ३० ते ४० टक्के ...

विजय सरवदे

औरंगाबाद : दीड महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग प्रभावित झाले असून ३० ते ४० टक्के क्षमतेने उत्पादन क्षमता घटली होती. गेल्या दोन दिवसांपासून ‘अनलॉक’नंतर उद्योगांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसू लागले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील बाजारपेठा बंद होत्या. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लॉकडाऊन सदृश स्थिती होती. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रशासनाचा संसर्ग कमी करण्यावर भर राहिला. दरम्यान, औरंगाबादेत १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागले होते. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाने ७ जूनपासून ‘अनलॉक’ जाहीर केले. अन्य जिल्ह्यांतही लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे राज्यातील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत.

तथापि, जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, चितेगाव या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लॉकडाऊनचा बऱ्यापैकी फटका बसला. स्थानिक (देशांतर्गत) बाजारपेठा बंद असल्यामुळे ५० टक्के उद्योगांनी उत्पादन क्षमता कमी केली. ऑर्डरचे प्रमाणही ३०-४० टक्क्यांनी कमी झाले. परिणामी, लघु व मध्यम उद्योगांचे अर्थचक्र कोलमडून गेले. बजाज ऑटोसारख्या मोठ्या उद्योगावरही आठवड्यात एक दिवसाचा ‘शट डाऊन’ घेण्याची वेळ आली. त्यामुळे व्हेंडर्स उद्योग अडचणीत आले.

दोन दिवसांपासून आता स्थानिक उद्योगांनी गती पकडली असून ६० ते ७० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू झाले आहे. औरंगाबादेतील लॉकडाऊन उघडल्याचा सर्वत्र संदेश पोहोचला, तर गावी गेलेले परप्रांतीय मजूरही लवरकच परत येतील, अशी शक्यता उद्योगांनी वर्तविली आहे.

उद्योगांच्या स्थितीबाबत उद्योजकांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थात मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक उद्योग सोडले, तर उर्वरित कंपन्या बंद होत्या. यंदा दुसऱ्या लाटेत खबरदारी घेत उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी होती. मात्र, बाजारपेठाच बंद असल्यामुळे उत्पादित माल विक्रीविना पडून राहिला. त्यामुळे उद्योगांनी स्वत:हूनच उत्पादन क्षमता कमी केली.

चौकट...................

जिल्ह्यातील उद्योग आता गती घेतील

यासंदर्भात ‘सीआयआय’चे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक मुकुंद कुलकर्णी व ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, आता सगळीकडे बाजारपेठा उघडल्या असल्यामुळे उद्योगांमध्ये आत्मविश्वास आला असून हळूहळू उत्पादन क्षमता वाढेल. या दोनच दिवसांत ६० ते ७० टक्के उत्पादन क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील उद्योग पूर्वपदावर येऊ शकतात.