जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, घनसावंगी, मंठा आणि भोकरदन या पाच पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारी पदे मंजूर करण्यात आली असून लवकरच नवीन अधिकारी तेथे रूजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘पंचायत राज’ मुळे आता पंचायत समित्यांचा कारभार विस्तीर्ण झाला असून एकट्या गटविकास अधिकार्यांच्या कामकाजावर त्यामुळे ताण पडत आहे. विकास कामांसाठी थेट ग्रामपंचायतींनाच अधिक प्रमाणात निधी दिला जात आहे. त्यासाठी शासनाने त्यांना सहायक अधिकारी नियुक्त करण्याचे ठरविलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यात यापूर्वी बदनापूर आणि जाफराबाद येथे सहाय्यक गटविकास अधिकार्यांची पदे भरलेली आहेत. मात्र अन्य तालुक्यात ती भरलेली नव्हती. गुरूवारी एका आदेशाद्वारे परतूर वगळता इतर वरील पाच तालुक्यात ही पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाच नवीन अधिकारी रूजू होणार आहेत.
५ सहायक बीडीओ येणार
By admin | Updated: May 23, 2014 00:22 IST