शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

जात पडताळणीची ४८ हजार प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 24, 2016 01:29 IST

औरंगाबाद : राज्यात जात पडताळणीची ४८ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. जात पडताळणीची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास

औरंगाबाद : राज्यात जात पडताळणीची ४८ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. जात पडताळणीची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक राजेश ढाबरे यांनी दिली. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी ढाबरे हे औरंगाबादेत आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जात पडताळणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सुसूत्रता आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. राज्यात जात पडताळणीसाठी १५ समित्या कार्यरत आहेत. ‘बार्टी’च्या माध्यमातून या समित्यांचे नियंत्रण करते. महसूल विभागातील अप्पर आयुक्त या पदावर कार्यरत असलेले अधिकारी हे जात पडताळणी समितीचे चेअरमन असतात. महसूल विभाग हे जात प्रमाणपत्र देते, तर त्या- त्या प्रमाणपत्रांची वैधता जात पडताळणी समिती ठरवते. भविष्यात जात पडताळणी समितीलाच जात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार द्यावेत, यासंबंधीचा प्रस्ताव आपण शासनाला सादर करणार आहोत. ज्यामुळे जात पडताळणीची प्रकरणे निकाली काढण्यास फारशी अडचण येणार नाही. प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. नवीन शासन आदेशानुसार जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत या समित्यांचे चेअरमन नियुक्त केले जातील. रक्ताच्या नात्यातील किमान तिघा जणांचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास त्वरित लाभार्थ्यास वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा आमचा विचार आहे. यावेळी जात पडताळणी समितीचे उपायुक्त पी. बी. बच्छाव, संशोधन अधिकारी डी. बी. खरात, प्रकल्प संचालक श्रीकांत देशमुख, सहायक प्रकल्प संचालक फेरोज पठाण उपस्थित होते.