शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

४७८ पाणीनमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 23:40 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात टंचाईमुळे ग्रामस्थ नाईलाजाने मिळेल त्या स्त्रोताचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर आगामी काळात पावसाळ्यामुळे अनेक स्त्रोतांचे पाणी दूषित होते. मे महिन्याच्या अहवालानुसार १0६७ पैकी ४७८ पाणीनमुने दूषित आढळले आहेत.हिंगोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. दर महिन्याला दूषित पाणी नमुने तपासले जातात. तरीही त्यांची संख्या फारसी घटत नसल्याचेच चित्र आहे. मे महिन्यात तपासणी केली असता जवळपास ४५ टक्क्यांपेक्षा पाणीनमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धी जनता तर शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचि असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यामुळे होणारे आजार व कोणते पाणी प्यावे याबाबत काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र तरीही हे चित्र असेल तर त्यातून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.आरोग्य यंत्रणांकडून ग्रामपंचायतींची जागृती करण्याची प्रक्रिया अधूनमधून घडते. मात्र तरीही ब्लिचिंग पावडर टाकण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीनमुने दूषित आढळत आहेत. अनेक ग्रामपंचायती तर ब्लिचिंगच खरेदी करीत नाहीत. काही गावांत तर वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणताच बदल होताना दिसत नाही. केवळ साथीचे आजार उद्भवल्यास तेवढ्यापुरती जागृती होते. उपायही केले जातात.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच पाणीतपासणी प्रयोगशाळा अशा दोन यंत्रणांकडून जिल्ह्यात तपासणी होते. यात कळमनुरी उपविभागात प्राथमिक आरोग्य केंद्र मसोडअंतर्गत ७९ पैकी ३३ नमुने दूषित, वाकोडीत ७५ पैकी ३१, बाळापूरचे ९७ पैकी ४0, पोत्र्याचे ३0 पैकी १९, रामेश्वर तांड्याचे २३ पैकी १२, नर्सी नामदेवचे १५ पैकी १३, सिरसम बु.चे १४ पैकी १0, भांडेगावचे १६ पैकी ११, साखऱ्याचे ३ पैकी ३, कापडसिंगीचे ६९ पैकी ५४ नमुने दूषित आढळले. काही ठिकाणी आरोग्य सेवक नमुने देतात. तर ग्रामपंचायतींचे जलसुरक्षक मात्र टाळाटाळ करीत आहेत.