शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

४७८ पाणीनमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 23:40 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात टंचाईमुळे ग्रामस्थ नाईलाजाने मिळेल त्या स्त्रोताचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर आगामी काळात पावसाळ्यामुळे अनेक स्त्रोतांचे पाणी दूषित होते. मे महिन्याच्या अहवालानुसार १0६७ पैकी ४७८ पाणीनमुने दूषित आढळले आहेत.हिंगोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. दर महिन्याला दूषित पाणी नमुने तपासले जातात. तरीही त्यांची संख्या फारसी घटत नसल्याचेच चित्र आहे. मे महिन्यात तपासणी केली असता जवळपास ४५ टक्क्यांपेक्षा पाणीनमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धी जनता तर शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचि असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यामुळे होणारे आजार व कोणते पाणी प्यावे याबाबत काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र तरीही हे चित्र असेल तर त्यातून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.आरोग्य यंत्रणांकडून ग्रामपंचायतींची जागृती करण्याची प्रक्रिया अधूनमधून घडते. मात्र तरीही ब्लिचिंग पावडर टाकण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीनमुने दूषित आढळत आहेत. अनेक ग्रामपंचायती तर ब्लिचिंगच खरेदी करीत नाहीत. काही गावांत तर वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणताच बदल होताना दिसत नाही. केवळ साथीचे आजार उद्भवल्यास तेवढ्यापुरती जागृती होते. उपायही केले जातात.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच पाणीतपासणी प्रयोगशाळा अशा दोन यंत्रणांकडून जिल्ह्यात तपासणी होते. यात कळमनुरी उपविभागात प्राथमिक आरोग्य केंद्र मसोडअंतर्गत ७९ पैकी ३३ नमुने दूषित, वाकोडीत ७५ पैकी ३१, बाळापूरचे ९७ पैकी ४0, पोत्र्याचे ३0 पैकी १९, रामेश्वर तांड्याचे २३ पैकी १२, नर्सी नामदेवचे १५ पैकी १३, सिरसम बु.चे १४ पैकी १0, भांडेगावचे १६ पैकी ११, साखऱ्याचे ३ पैकी ३, कापडसिंगीचे ६९ पैकी ५४ नमुने दूषित आढळले. काही ठिकाणी आरोग्य सेवक नमुने देतात. तर ग्रामपंचायतींचे जलसुरक्षक मात्र टाळाटाळ करीत आहेत.