शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

४७८ पाणीनमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 23:40 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात टंचाईमुळे ग्रामस्थ नाईलाजाने मिळेल त्या स्त्रोताचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर आगामी काळात पावसाळ्यामुळे अनेक स्त्रोतांचे पाणी दूषित होते. मे महिन्याच्या अहवालानुसार १0६७ पैकी ४७८ पाणीनमुने दूषित आढळले आहेत.हिंगोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. दर महिन्याला दूषित पाणी नमुने तपासले जातात. तरीही त्यांची संख्या फारसी घटत नसल्याचेच चित्र आहे. मे महिन्यात तपासणी केली असता जवळपास ४५ टक्क्यांपेक्षा पाणीनमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धी जनता तर शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचि असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यामुळे होणारे आजार व कोणते पाणी प्यावे याबाबत काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र तरीही हे चित्र असेल तर त्यातून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.आरोग्य यंत्रणांकडून ग्रामपंचायतींची जागृती करण्याची प्रक्रिया अधूनमधून घडते. मात्र तरीही ब्लिचिंग पावडर टाकण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीनमुने दूषित आढळत आहेत. अनेक ग्रामपंचायती तर ब्लिचिंगच खरेदी करीत नाहीत. काही गावांत तर वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणताच बदल होताना दिसत नाही. केवळ साथीचे आजार उद्भवल्यास तेवढ्यापुरती जागृती होते. उपायही केले जातात.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच पाणीतपासणी प्रयोगशाळा अशा दोन यंत्रणांकडून जिल्ह्यात तपासणी होते. यात कळमनुरी उपविभागात प्राथमिक आरोग्य केंद्र मसोडअंतर्गत ७९ पैकी ३३ नमुने दूषित, वाकोडीत ७५ पैकी ३१, बाळापूरचे ९७ पैकी ४0, पोत्र्याचे ३0 पैकी १९, रामेश्वर तांड्याचे २३ पैकी १२, नर्सी नामदेवचे १५ पैकी १३, सिरसम बु.चे १४ पैकी १0, भांडेगावचे १६ पैकी ११, साखऱ्याचे ३ पैकी ३, कापडसिंगीचे ६९ पैकी ५४ नमुने दूषित आढळले. काही ठिकाणी आरोग्य सेवक नमुने देतात. तर ग्रामपंचायतींचे जलसुरक्षक मात्र टाळाटाळ करीत आहेत.