शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची पाठ; जायकवाडीत भरमसाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:11 IST

जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस मात्र आपल्या जायकवाडी धरणाला तृप्त करीत आहे, एवढीच आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले, तरीही औरंगाबाद जिल्ह्यावर वरुणराजा धो-धो कोसळत नसल्याने बळीराजाची धकधक वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस मात्र आपल्या जायकवाडी धरणाला तृप्त करीत आहे, एवढीच आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पावसाचा जायकवाडी धरणावर परिणाम होत नाही. नाशिक, नगर जिल्ह्यातील पावसावरच जायकवाडीचे भवितव्य अवलंबून आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला काही तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात करुन शेतकºयांनी उत्साहाने पेरणी करुन टाकली. त्यानंतर मात्र पावसाने हात आखडता घेतला. केवळ रिमझिम पावसाचा खेळ जिल्ह्यात सुरु असल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील जायकवाडी वगळता एकाही जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ३१.१६ टक्केच पाऊस झाला आहे. सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत ४६.५४ टक्के, औरंगाबाद तालुका-३०.३४ टक्के, फुलंब्री-४२.१८, पैठण-१६.०६, सोयगाव-२२.९४, कन्नड-३६.२०, वैजापूर -४५.९२, गंगापूर-२४.५१, खुलताबाद -२१.७२ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वात कमी पाऊस पैठण तालुक्यात झाला. त्यामुळे यंदाचा हंगाम गेल्यातजमा आहे.शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्च वाया गेला असून काही शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. एवढे करुनही पाऊस आला नाही तर बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे. सध्या शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.