शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

रखडलेली ४५ कोटींची कामे रद्द!

By admin | Updated: August 26, 2014 01:52 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिल्ह्यात दरवर्षी हजारो विकासकामे करण्यात येतात. ही कामे बेरोजगार मजूर संस्था आणि मोठ्या कंत्राटदारांकडून करण्यात येतात

 

मुजीब देवणीकर , औरंगाबाद

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिल्ह्यात दरवर्षी हजारो विकासकामे करण्यात येतात. ही कामे बेरोजगार मजूर संस्था आणि मोठ्या कंत्राटदारांकडून करण्यात येतात. मात्र, काही कंत्राटदार, संस्था कामांची वर्कआॅर्डर करून घेतात; पण प्रत्यक्षात कामच सुरू करीत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा कामांची एकत्रित यादी करून तब्बल ४५ कोटींची कामेच रद्द करून टाकली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाज कंत्राटदार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार चालते असे म्हटले जाते. कामे मिळविण्यापासून थेट बिले काढण्यापर्यंत याच मंडळींचा वरचष्मा असतो. कंत्राटदार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या लॉबीसमोर अनेकदा अधिकारी, हतबल होतात. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेगवेगळ्या हेडमध्ये पैसेच शिल्लक नाहीत; पण बिले काढून द्या असा सतत तगादा अधिकाऱ्यांना लावण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे विविध कामांच्या वर्कआॅर्डर मिळविण्यावरही भर देण्यात येत आहे. दररोजच्या या कटकटीमुळे अधिकाऱ्यांनी एक शक्कल लढविली. मागील तीन वर्षांमध्ये ज्या मजूर संस्था आणि मोठ्या कंत्राटदारांनी कामे घेतली त्या कामांची एक यादी करण्यात आली. प्रत्येक कामाची घटनास्थळावर जाऊन चौकशी करण्यात आली की, काम सुरू झाले किंवा नाही. काम सुरूच झाले नसल्याचा अहवाल संबंधित कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे तब्बल ४५ कोटी रुपयांची ही सर्व कामे रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, दर दोन ते तीन वर्षांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. जुनी कामे मिळविलेले कंत्राटदार आणि मजूर संस्था थेट बिलच सादर करतात. ४नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबद्दल फारशी माहिती नसते त्यामुळे ही बिले मंजूर होण्याची दाट शक्यता असते. बोगस बिले सादर करणारे अनेकदा कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतात. या सर्व कारभाराला कुठेतरी अंकुश बसावा, या हेतूने मोठ्या प्रमाणात कामे रद्द करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागातील एक कार्यकारी अभियंता निवृत्त झाले. हे निवृत्त अधिकारी अजून शासकीय निवासस्थान सोडायला तयार नाहीत. ते या निवासस्थानात थांबून जुन्या तारखांमध्ये अजूनही कारभार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंगल्यासमोर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मजूर संस्थांचे पदाधिकारी, कंत्राटदार तळ ठोकून असतात.