शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसानीचे ४३,४२० दावे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

--- - कृषी विभाग : ४२,८९८ हजार सर्वेक्षण पूर्ण -विमा कंपनी : ५८ हजार सर्वेक्षणाचा दावा --- औरंगाबाद : ...

---

- कृषी विभाग : ४२,८९८ हजार सर्वेक्षण पूर्ण

-विमा कंपनी : ५८ हजार सर्वेक्षणाचा दावा

---

औरंगाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. आतापर्यंत १ लाख ११ हजार ८५३ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची माहिती (इंटिमेशन) कृषी विभाग, विमा कंपनीला दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४२ हजार ८९८ शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. तर ४३ हजार ४२० दावे फेटाळण्यात आले असून, २५ हजार ५३६ दाव्यांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. आतापर्यंत ५८ हजार दाव्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा विमा कंपनीकडून करण्यात आला आहे.

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरंस कंपनीकडून प्रतिनिधींच्या मदतीने सर्वेक्षण प्रक्रिया सुरू असून, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुन्हा नुकसानीच्या सुमारे ७० हजारांवर माहिती आणखी शेतकऱ्यांकडून कंपनीकडे आली आहे. त्याची निश्चित आकडेवारी अद्याप कळाली नाही. अनेक ठिकाणी जमीन खरडून वाहून गेली. तर पीक विमा कवच असलेल्या शेतकऱ्यांसोबत विमा नसलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसान अधिक आहे. त्यांचे मदतीकडे लक्ष लागले आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ११ सप्टेंबर रोजी पुढील पाच दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील असे सांगितले होते. त्यानंतर १५ दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. १५ ऑक्टोबर नंतर रब्बी हंगाम सुरू होईल. त्यामुळे त्याअगोदरच्या दाव्यांतील सर्वेक्षणाची आकडेवारी अंतिम असेल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

--

आणखी ७० हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची शक्यता

--

१.११ लाखांपैकी सुमारे ५८ हजार शेतांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. पुढील २ दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. रद्द झालेल्या ४३ हजार दाव्यांत एकाच शेतातील नुकसानीच्या २-३ इंटिमेशनचा समावेश होता. त्यामुळे तो आकडा अधिक वाढलेला दिसतो. या दाव्यांशिवाय आणखी इंटिमेशन सुरू असून, तो आकडा ७० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचे चित्र पुढीलच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

-रामनाथ भिंगारे, पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक