शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

४२ गावांना दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

४२ गावांना दूषित पाणीपुरवठा

फकीरा देशमुख भोकरदनभोकरदन तालुक्यात जुलै महिन्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने १२८ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ४२ गावातील ४५ नमुने दूषित आढळून आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते. भोकरदन शहरासह ग्रामीण भागात हे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. जो पर्यंत एखाद्या गावाला साथीच्या आजराची लागण होत नाही तोपर्यंत कोणाचेही लक्षात हा प्रकार येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आरोग्य विभागाने जुलै महिन्यात तालुक्यातील आन्वा २५, धावडा १२, हसनाबाद १३, जळगाव सपकाळ ५, केदारखेडा २०, राजूर १८, पिंपळगाव रेणूकाई २५, वालसावंगी १० या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या एकूण १२८ ठिकाणचे पाणी नमुने घेतले. त्यापैकी वाकडी, पाडा, वाडी बु, मुठाड, आव्हाना, ठालेवाडी, दहिगाव, पोखरी, वडोदतांगडा, वाढोणा, पंढरपूरवाडी, तडेगाव, पिंपळगाव सुतार, टाकेवाडी, वाल्मीक नगर, नांजावाडी, बेलोरा, बंरजळा, केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, कुंभारी, टाकळी, जानेफळ, राजूर, थिगळखेडा, पिंपळगाव बारव, बामखेडा, वालसा, कोळेगाव, बाभूळगाव, ताडकळस, पिंपळगाव रेणुकाई, वरूड, सिपोरा बाजार, बोरगाव, पारध खुर्द, पारध बु, या गावात घेण्यात आलेले पाणी नमुने दूषित आढळले आहेत़