सोमनाथ खताळ , बीड‘विवाह म्हणजे दोन जिवांचे मधूर मिलन, सनई सुरांच्या मंजूळ स्वरात, नवजिववनात केलेले पदार्पन, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसुत्रात केलेली पवित्र गुंफण’हे शुभकाम येथील स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाण मागील चार वर्षापासून करीत आहे. सोमवारी हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने १५ जोडप्यांच्या रेशीमगाठी जूळवून आणण्याचे काम या प्रतिष्ठाणने केले आहे. आतापर्यंत या प्रतिष्ठाणकडून ४० जणांच्या आयुष्याच्या रेशीमगाठी बांधल्या आहेत़गरीब परिस्थिती... त्यात दुष्काळ... पिकेही गेली... संसाराचा गाढा हाकायचा कसा?... लेकराबाळांचे हात पिवळे करायचे कसे?... यासारखे अनेक प्रश्न गरीबांपुढे असतात. मात्र अशा लोकांच्या आयुष्यात सुवर्णक्षण आणण्याचे काम स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाण करीत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी खटोड परिवाराने स्वत:ला पूर्ण झोकून दिले आहे.सोमवारी शाही थाटात हे विवाह पार पडले. सकाळी सर्व वरांची मिरवणूक काढण्यात आली. नवरदेव घोड्यावर... समोर बँडबाजा... मागे वऱ्हाडी मंडळींची रांग आणि समोर मित्रांचा डान्स अशाप्रकारे सर्व नवरदेव दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास सभामंडपात दाखल झाले. येथे आल्यांनतर सर्व नवरदेवांना प्रतिष्ठाणकडून फेटे बांधण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत झाले. मनोगत संपताच ‘शुभमंगल सावधान’ चा आवाज मंडपमध्ये घुमला आणि अक्षदांच्या माध्यमातून ज्येष्ठ, युवक, मित्र, मैत्रिणी यांनी शुभेच्छा, आशीर्वाद दिले.विवाहानंतर आलेल्या नातेवाईकांची व वऱ्हाडींची जेवणाची सोयही प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली होती, असे संयोजक सुशील खटोड, शुभम खटोड यांनी बोलताना सांगितले़
चार वर्षात ४० रेशीमगाठी
By admin | Updated: January 6, 2015 01:08 IST