शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

चार वर्षात ४० रेशीमगाठी

By admin | Updated: January 6, 2015 01:08 IST

सोमनाथ खताळ , बीड ‘विवाह म्हणजे दोन जिवांचे मधूर मिलन,

सोमनाथ खताळ , बीड‘विवाह म्हणजे दोन जिवांचे मधूर मिलन, सनई सुरांच्या मंजूळ स्वरात, नवजिववनात केलेले पदार्पन, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसुत्रात केलेली पवित्र गुंफण’हे शुभकाम येथील स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाण मागील चार वर्षापासून करीत आहे. सोमवारी हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने १५ जोडप्यांच्या रेशीमगाठी जूळवून आणण्याचे काम या प्रतिष्ठाणने केले आहे. आतापर्यंत या प्रतिष्ठाणकडून ४० जणांच्या आयुष्याच्या रेशीमगाठी बांधल्या आहेत़गरीब परिस्थिती... त्यात दुष्काळ... पिकेही गेली... संसाराचा गाढा हाकायचा कसा?... लेकराबाळांचे हात पिवळे करायचे कसे?... यासारखे अनेक प्रश्न गरीबांपुढे असतात. मात्र अशा लोकांच्या आयुष्यात सुवर्णक्षण आणण्याचे काम स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाण करीत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी खटोड परिवाराने स्वत:ला पूर्ण झोकून दिले आहे.सोमवारी शाही थाटात हे विवाह पार पडले. सकाळी सर्व वरांची मिरवणूक काढण्यात आली. नवरदेव घोड्यावर... समोर बँडबाजा... मागे वऱ्हाडी मंडळींची रांग आणि समोर मित्रांचा डान्स अशाप्रकारे सर्व नवरदेव दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास सभामंडपात दाखल झाले. येथे आल्यांनतर सर्व नवरदेवांना प्रतिष्ठाणकडून फेटे बांधण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत झाले. मनोगत संपताच ‘शुभमंगल सावधान’ चा आवाज मंडपमध्ये घुमला आणि अक्षदांच्या माध्यमातून ज्येष्ठ, युवक, मित्र, मैत्रिणी यांनी शुभेच्छा, आशीर्वाद दिले.विवाहानंतर आलेल्या नातेवाईकांची व वऱ्हाडींची जेवणाची सोयही प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली होती, असे संयोजक सुशील खटोड, शुभम खटोड यांनी बोलताना सांगितले़