शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST

कळंब : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माळीनगर येथील गिताई प्रतिष्ठानने हात पुढे केले असून,

कळंब : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माळीनगर येथील गिताई प्रतिष्ठानने हात पुढे केले असून, बुधवारी कळंब येथे झालेल्या एका कार्यक्रमात तालुक्यातील ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी रोख ११ हजार रुपयाची व धान्याची मदत वितरित करण्यात आली. कळंब तालुका पत्रकार संघ व महसूल प्रशासन कळंब यांनी कळंब तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काही सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. यास माळीनगर (अकलूज, जि. सोलापूर) येथील गिताई प्रतिष्ठानने सकारात्मक प्रतिसाद देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कळंब तालुका भयान दुष्काळी स्थितीला सामोरा जात आहे. २२ महिन्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कळंब पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी कळंब पत्रकार संघ, महसूल प्रशासन व गिताई प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ‘विचार बदला, दिवस बदलतील’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी दि. सासवड माळी शुगर लि. चे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे तर गिताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. विद्या एकतपुरे, सचिव स्मिता म्हेत्रे, खजीनदार चेतन तम्हाणे, डॉ. भूषण म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विशाल सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष अनंत आडसूळ, बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, सभापती जयश्री कांबळे, माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, तहसीलदार प्रदीप उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी २०१३-१४ व १४-१५ मध्ये आत्महत्या केलेल्या कळंब तालुक्यातील ४० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते रोख एक हजार रुपये, दहा हजाराचा धनादेश, पाच किलो तांदूळ, गहू व साखरेचे वाटप करण्यात आले. कुटुंबाचे सर्वेक्षण करणार - गिरमे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला नेमकी कोणती मदत करायला हवी, याचे माळीनगर शुगरच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येईल. शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे मोफत खताचा पुरवठा करण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील ११० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात येईल, असेही गिरमे यांनी सांगितले. (वार्ताहर)