शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST

कळंब : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माळीनगर येथील गिताई प्रतिष्ठानने हात पुढे केले असून,

कळंब : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माळीनगर येथील गिताई प्रतिष्ठानने हात पुढे केले असून, बुधवारी कळंब येथे झालेल्या एका कार्यक्रमात तालुक्यातील ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी रोख ११ हजार रुपयाची व धान्याची मदत वितरित करण्यात आली. कळंब तालुका पत्रकार संघ व महसूल प्रशासन कळंब यांनी कळंब तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काही सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. यास माळीनगर (अकलूज, जि. सोलापूर) येथील गिताई प्रतिष्ठानने सकारात्मक प्रतिसाद देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कळंब तालुका भयान दुष्काळी स्थितीला सामोरा जात आहे. २२ महिन्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कळंब पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी कळंब पत्रकार संघ, महसूल प्रशासन व गिताई प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ‘विचार बदला, दिवस बदलतील’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी दि. सासवड माळी शुगर लि. चे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे तर गिताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. विद्या एकतपुरे, सचिव स्मिता म्हेत्रे, खजीनदार चेतन तम्हाणे, डॉ. भूषण म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विशाल सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष अनंत आडसूळ, बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, सभापती जयश्री कांबळे, माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, तहसीलदार प्रदीप उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी २०१३-१४ व १४-१५ मध्ये आत्महत्या केलेल्या कळंब तालुक्यातील ४० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते रोख एक हजार रुपये, दहा हजाराचा धनादेश, पाच किलो तांदूळ, गहू व साखरेचे वाटप करण्यात आले. कुटुंबाचे सर्वेक्षण करणार - गिरमे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला नेमकी कोणती मदत करायला हवी, याचे माळीनगर शुगरच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येईल. शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे मोफत खताचा पुरवठा करण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील ११० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात येईल, असेही गिरमे यांनी सांगितले. (वार्ताहर)