शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कंपनीला ४० कोटींचे दान

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे. कंपनी आणि मनपाच्या ७९२ कोटींच्या करारात या रकमेचा कुठेही समावेश नाही. कंपनीला ही जलवाहिनी फुकटात मिळाली आहे. सप्टेंबर २०११ मध्ये झालेल्या कन्सेशन अ‍ॅग्रीमेंटपूर्वी ४० कोटी रुपयांतून ती योजना मनपाला मंजूर झाली होती. तरीही ती रक्कम पालिकेने करारातून वजा केलेली नाही. १ सप्टेंबरपासून कंपनी शहराला पाणीपुरवठा करीत आहे. राज्य शासनाने २००९ मध्ये सुजल निर्मल या योजनेंतर्गत ४० कोटी रुपयांचा विशेष निधी पाणीपुरवठ्यासाठी दिला होता़ त्यातून मनपाने कांचनवाडी ते ज्युबिली पार्कपर्यंत ८०० मि़मी़ व्यासाच्या जलवाहिनीचे काम सुरू केले़ ते काम हायड्रोक्लोरिक डिझाईन न करता पूर्ण केले आहे़ मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे ती जलवाहिनी वॉटर हॅमरिंगने (वेगाने पाणी आदळणे) वारंवार फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.जलवाहिनीला वरद गणेश मंदिराजवळ मोठा बेंड लावण्यात आला आहे़ तेथे पूर्वीची ७०० मि़मी़ची जलवाहिनी गेलेली आहे़ त्याच जलवाहिनीच्या बॅरिगेट्सवर नवीन जलवाहिनी ‘रेस्ट’ करण्यात आली आहे़ त्या ठिकाणी ‘भूमितीचे’ सर्व निकष डावलून काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कांचनवाडी ते ज्युबिलीपार्कपर्यंत ७५० मि.मी़ व्यासाची जलवाहिनी असताना ४० कोटी रुपयांची जलवाहिनी सुजल निर्मलमधून फक्त आणि फक्त समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीसाठी गिफ्ट म्हणून टाकण्यात आली. १२ वॉर्डांना त्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणार आहे. कंपनीने अजून इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काहीही काम सुरू केले नाही.शासनाने देऊ केलेली एवढी मोठी रक्कम एकाच जलवाहिनीवर खर्ची घालण्याचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले़ विशेष म्हणजे ती रक्कम समांतर जलवाहिनीच्या करारातून वगळली नाही़ दरम्यान, नाव न सांगण्याच्या अटीवर उपअभियंत्यांनी सांगितले की, त्या जलवाहिनीचे काम तांत्रिकदृष्ट्या ८०० ते ५०० मी़मी़च्या आकारात झाले आहे. समांतरच्या करारात या रकमेचा समावेश नाही. दीड वर्षापूर्वीच जलवाहिनीचे काम झाले होते. मात्र, पाणीपुरवठा विभागाने तिचे तोंड उघडले नाही. त्यामुळे विद्यापीठ व नंदनवन कॉलनी परिसरात उच्च दाबाने कधीही पाणीपुरवठा झाला नाही. समांतरसाठी त्या जलवाहिनीचे तोंड बंदच ठेवले. योजना हस्तांतरित झाल्यानंतर जलवाहिनीचे तोंड उघडले? या बदमाशगिरीमुळे नागरिकांना दीड वर्ष पाण्यासाठी भटकावे लागले.मुंबईच्या एसएमसी या कंत्राटदार संस्थेने योजनेचे काम केले आहे़ कंत्राटदाराने डिझाईन देणे गरजेचे होते़ मात्र, तसे न झाल्यामुळे वरद गणेश मंदिराजवळ ती जलवाहिनी अतिशय कमी जागेतून टाकण्यात आली. भूसंपादनाची कुठेही गरज भासू नये यासाठी तो खटाटेप केला. अंतर्गत खोदकाम करून ती जलवाहिनी टाकल्यामुळे तिच्यात घाण साचली.