शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीला ४० कोटींचे दान

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे. कंपनी आणि मनपाच्या ७९२ कोटींच्या करारात या रकमेचा कुठेही समावेश नाही. कंपनीला ही जलवाहिनी फुकटात मिळाली आहे. सप्टेंबर २०११ मध्ये झालेल्या कन्सेशन अ‍ॅग्रीमेंटपूर्वी ४० कोटी रुपयांतून ती योजना मनपाला मंजूर झाली होती. तरीही ती रक्कम पालिकेने करारातून वजा केलेली नाही. १ सप्टेंबरपासून कंपनी शहराला पाणीपुरवठा करीत आहे. राज्य शासनाने २००९ मध्ये सुजल निर्मल या योजनेंतर्गत ४० कोटी रुपयांचा विशेष निधी पाणीपुरवठ्यासाठी दिला होता़ त्यातून मनपाने कांचनवाडी ते ज्युबिली पार्कपर्यंत ८०० मि़मी़ व्यासाच्या जलवाहिनीचे काम सुरू केले़ ते काम हायड्रोक्लोरिक डिझाईन न करता पूर्ण केले आहे़ मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे ती जलवाहिनी वॉटर हॅमरिंगने (वेगाने पाणी आदळणे) वारंवार फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.जलवाहिनीला वरद गणेश मंदिराजवळ मोठा बेंड लावण्यात आला आहे़ तेथे पूर्वीची ७०० मि़मी़ची जलवाहिनी गेलेली आहे़ त्याच जलवाहिनीच्या बॅरिगेट्सवर नवीन जलवाहिनी ‘रेस्ट’ करण्यात आली आहे़ त्या ठिकाणी ‘भूमितीचे’ सर्व निकष डावलून काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कांचनवाडी ते ज्युबिलीपार्कपर्यंत ७५० मि.मी़ व्यासाची जलवाहिनी असताना ४० कोटी रुपयांची जलवाहिनी सुजल निर्मलमधून फक्त आणि फक्त समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीसाठी गिफ्ट म्हणून टाकण्यात आली. १२ वॉर्डांना त्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणार आहे. कंपनीने अजून इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काहीही काम सुरू केले नाही.शासनाने देऊ केलेली एवढी मोठी रक्कम एकाच जलवाहिनीवर खर्ची घालण्याचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले़ विशेष म्हणजे ती रक्कम समांतर जलवाहिनीच्या करारातून वगळली नाही़ दरम्यान, नाव न सांगण्याच्या अटीवर उपअभियंत्यांनी सांगितले की, त्या जलवाहिनीचे काम तांत्रिकदृष्ट्या ८०० ते ५०० मी़मी़च्या आकारात झाले आहे. समांतरच्या करारात या रकमेचा समावेश नाही. दीड वर्षापूर्वीच जलवाहिनीचे काम झाले होते. मात्र, पाणीपुरवठा विभागाने तिचे तोंड उघडले नाही. त्यामुळे विद्यापीठ व नंदनवन कॉलनी परिसरात उच्च दाबाने कधीही पाणीपुरवठा झाला नाही. समांतरसाठी त्या जलवाहिनीचे तोंड बंदच ठेवले. योजना हस्तांतरित झाल्यानंतर जलवाहिनीचे तोंड उघडले? या बदमाशगिरीमुळे नागरिकांना दीड वर्ष पाण्यासाठी भटकावे लागले.मुंबईच्या एसएमसी या कंत्राटदार संस्थेने योजनेचे काम केले आहे़ कंत्राटदाराने डिझाईन देणे गरजेचे होते़ मात्र, तसे न झाल्यामुळे वरद गणेश मंदिराजवळ ती जलवाहिनी अतिशय कमी जागेतून टाकण्यात आली. भूसंपादनाची कुठेही गरज भासू नये यासाठी तो खटाटेप केला. अंतर्गत खोदकाम करून ती जलवाहिनी टाकल्यामुळे तिच्यात घाण साचली.