शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

जिल्ह्यात ४ लाखांपर्यंत लोक दारिद्र्यरेषेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST

स.स़ो.खंडाळकर औरंगाबाद : २००१ नंतर जुने कार्ड जीर्ण होऊन फाटायला आले, तरी नवे रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले ...

स.स़ो.खंडाळकर

औरंगाबाद : २००१ नंतर जुने कार्ड जीर्ण होऊन फाटायला आले, तरी नवे रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणे कठीण झाले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा १९९७ पासून आढावाच घेण्यात आलेला नाही किंवा सर्वेक्षणही केलेले नाही. त्यामुळे समाजातील खरे गरीब कोण व श्रीमंत कोण, हेच कळेनासे झाले आहे. कार तसेच बाईकवर येऊन ‘बीपीएल’साठी रेशनकार्डवर असलेला माल घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्यांच्या घरी टीव्ही, फ्रीज आहेत, असेही बोगस ‘बीपीएल’वाले आहेत. ते शोधून बाजूला काढण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील रेशन कार्डांची संख्या- ७ लाख ४५ हजार ७१६

शहर व जिल्हा मिळून बीपीएल कार्डधारक-१ लाख ७७ हजार ३७१

अंत्योदय कार्डधारक-६९ हजार ६३९

केसरी कार्डधारक-५लाख १७ हजार ९३९

अन्नपूर्णा कार्डधारक-२ हजार ९९

पांढरे कार्डधारक-११ हजार ७८६

कोणत्या तालुक्यात किती दारिद्रयरेषेखालील कार्डधारक

औरंगाबाद शहर- ५२ हजार ३४२

औरंगाबाद तालुका- ९ हजार ३४५

फुलंब्री- ७ हजार २६३

पैठण- २० हजार ५४५

सिल्लोड-१७ हजार २४६

कन्नड-२५ हजार ९४७

सोयगाव-४ हजार ५२५

वैजापूर-१८ हजार ५५१

गंगापूर-२० हजार ६२४

खुलताबाद-१ हजार ४३

................

दारिद्र्यरेषेचे निकष काय?

बीपीएलसाठी ३९ हजार रुपये एवढी उत्पन्नाची अट आहे.

अंत्योदयसाठी २२ हजार इतकी उत्पन्नाची अट आहे

१ लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना केसरी कार्ड मिळते.

ज्यांच्याकडे टीव्ही, फ्रिज, कार नाही ते ‘बीपीएल’मध्ये मोडतात.

...............

आता फक्त गहू- तांदूळच...

रेशन दुकानांवर हल्ली फक्त गहू- तांदूळच मिळते. २०१४ पूर्वी डालडा, साखर, रवा, मैदा, गोडे तेल आणि रॉकेल मिळायचे. आता यातले काहीच मिळत नाही.

.............

नियतन वेळेवर मिळत नाही....

रेशन दुकानदारांना नियतन वेळेवर मिळत नाही. दर महिन्याच्या एक तारखेला नियतन मिळाल्यास रेशन दुकानदार ग्राहकांची महिनाभर सेवा करू शकतील; परंतु असे होत नाही. नियतन कधी दहा तारखेला, तर कधी पंधरा तारखेला प्राप्त होते. त्यामुळे कार्डधारकांना तेवढीच सेवा मिळते.

- डी. एन. पाटील, अध्यक्ष- स्वस्त धान्य दुकानदार महासंघ.

................

माझ्याकडे प्रभार......

जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा माझ्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. वर्षाराणी भोसले जानेवारीपर्यंत रजेवर आहेत. नियमानुसार पुरवठा विभागाचे काम सुरू आहे. गहू आणि तांदळाचे नियतनही वेळेवर दिले जाते.

- दत्ता भारस्कर, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी