शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

३९५ ग्रा.पं.ची रणधुमाळी

By admin | Updated: March 31, 2015 00:38 IST

लातूर : मुदत संपलेल्या ३९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र घेणे व भरण्यास प्रारंभ होणार आहे.

लातूर : मुदत संपलेल्या ३९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र घेणे व भरण्यास प्रारंभ होणार आहे. ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. तर २२ एप्रिलला मतदान होणार आहे. याशिवाय, ४५ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूकही याचवेळी होणार आहे.जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी केली. ३० मार्चपासून नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे. ७ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची मुदत आहे. २, ३ व ५ एप्रिल हे सुटीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्र भरता येतील. ८ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. संबंधित तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १० एप्रिल असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १० एप्रिल रोजीच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दुपारी ३ नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप होईल. २२ एप्रिल रोजी या ३९५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी २३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी मतमोजणी होईल. २५ एप्रिल रोजी या ग्रा.पं.चा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिली. (प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात ३९५ ग्रामपंचायतींबरोबर ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही आहेत. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही ३९५ ग्रामपंचायतींप्रमाणेच आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानाची वेळ मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत राहणार आहे. पोटनिवडणुकीसाठी लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा, अंकोली, रायवाडी, ममदापूर, औसा तालुक्यातील सारणी, बोरगाव (ऩ) काळमाथा, मातोळा, किल्लारी, रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी, शेरा, धवेली, उदगीर तालुक्यातील मलकापूर, डिग्रस, बनशेळकी, मोर्तळवाडी,हैबतपूर, तिवटग्याळ, मोघा, अहमदपूर तालुक्यातील वळसंगी, राळगा, वरवंटी, चाकूर तालुक्यातील महांडोळ, मष्णेरवाडी, देवणी तालुक्यातील हिसामनगर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, हणमंतवाडी, बाकली, दैठणा, बेवनाळ, रापका, जळकोट तालुक्यातील येवरी अशा एकूण ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत़ तर निलंगा तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुकीत समावेश नाही़ ३० मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्रांची स्वीकृती व विक्री होणार आहे. त्यात २, ३ व ५ एप्रिल अशा तीन सुट्या आहेत. नऊ दिवसांपैकी तीन दिवस सुट्या आल्याने सहा दिवसच अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी आहेत. १० एप्रिलला चिन्हांचे वाटप होणार आहे. आणि २२ एप्रिल रोजी मतदान आहे. उमेदवारांना केवळ १२ दिवसच प्रचाराला मिळणार आहे. १२ दिवसांत उमेदवारांना निवडणुकीचा फड जिंकायचा आहे.