शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

३९५ ग्रा.पं.ची रणधुमाळी

By admin | Updated: March 31, 2015 00:38 IST

लातूर : मुदत संपलेल्या ३९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र घेणे व भरण्यास प्रारंभ होणार आहे.

लातूर : मुदत संपलेल्या ३९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र घेणे व भरण्यास प्रारंभ होणार आहे. ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. तर २२ एप्रिलला मतदान होणार आहे. याशिवाय, ४५ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूकही याचवेळी होणार आहे.जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी केली. ३० मार्चपासून नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे. ७ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची मुदत आहे. २, ३ व ५ एप्रिल हे सुटीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्र भरता येतील. ८ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. संबंधित तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १० एप्रिल असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १० एप्रिल रोजीच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दुपारी ३ नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप होईल. २२ एप्रिल रोजी या ३९५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी २३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी मतमोजणी होईल. २५ एप्रिल रोजी या ग्रा.पं.चा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिली. (प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात ३९५ ग्रामपंचायतींबरोबर ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही आहेत. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही ३९५ ग्रामपंचायतींप्रमाणेच आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानाची वेळ मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत राहणार आहे. पोटनिवडणुकीसाठी लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा, अंकोली, रायवाडी, ममदापूर, औसा तालुक्यातील सारणी, बोरगाव (ऩ) काळमाथा, मातोळा, किल्लारी, रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी, शेरा, धवेली, उदगीर तालुक्यातील मलकापूर, डिग्रस, बनशेळकी, मोर्तळवाडी,हैबतपूर, तिवटग्याळ, मोघा, अहमदपूर तालुक्यातील वळसंगी, राळगा, वरवंटी, चाकूर तालुक्यातील महांडोळ, मष्णेरवाडी, देवणी तालुक्यातील हिसामनगर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, हणमंतवाडी, बाकली, दैठणा, बेवनाळ, रापका, जळकोट तालुक्यातील येवरी अशा एकूण ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत़ तर निलंगा तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुकीत समावेश नाही़ ३० मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्रांची स्वीकृती व विक्री होणार आहे. त्यात २, ३ व ५ एप्रिल अशा तीन सुट्या आहेत. नऊ दिवसांपैकी तीन दिवस सुट्या आल्याने सहा दिवसच अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी आहेत. १० एप्रिलला चिन्हांचे वाटप होणार आहे. आणि २२ एप्रिल रोजी मतदान आहे. उमेदवारांना केवळ १२ दिवसच प्रचाराला मिळणार आहे. १२ दिवसांत उमेदवारांना निवडणुकीचा फड जिंकायचा आहे.