शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

३९५ ग्रा.पं. निवडणुकीसाठी ८२०२ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: April 17, 2015 00:41 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरातून८ हजार २०२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेग आला आहे.लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतीअंतर्गत व ४४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ९९५८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ९ हजार ५६७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर ३९१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. काही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अखेरच्या टप्प्यात ८ हजार २०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने गावोगावी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. तर पोटनिवडणुकीमध्ये ४४ ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायतींमध्ये ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. यापैकी १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर ३६ उमेदवार पोटनिवडणुकीअंतर्गत निवडणूक रिंगणात आहेत. लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने चार निवडणूक समन्वयक पाठविले आहे. यामध्ये लातूर व औशासाठी गजानन जोशी, अहमदपूर, चाकूर व रेणापूर या तीन तालुक्यांसाठी बाबासाहेब झुंबडे, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यांसाठी नवनाथ माने, तर उदगीर आणि जळकोट तालुक्यांसाठी मारुती कोठारे अशा चौघांना निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यासाठी पाठविले आहे. (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या आहेत. यामध्ये लातूर-६, रेणापूर-३, निलंगा-१३, उदगीर-४, अहमदपूर-८, चाकूर-३, देवणी-५, शिरूर अनंतपाळ-४, जळकोट-४ अशा एकूण ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर ३२ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत सहा ग्रामपंचायतींच्या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये औसा-१, निलंगा-०, उदगीर-१, अहमदपूर-२, चाकूर-१ आणि देवणी-१ आदींचा समावेश आहे. बिनविरोध निवडीमुळे या गावांतील ग्रामपंचायतींवर केला जाणारा खर्च वाचला आहे. १५५० मतदान यंत्र दाखल...४जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ३२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका यासाठी १५५० इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन त्या-त्या तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या आहेत. या मशीनबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी हैदराबादचे तीन इंजिनिअर दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३९५ ग्रामपंचायती व ३२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी १४७ निवडणूक निर्णय अधिकारी, ११७ क्षेत्रीय अधिकारी, १४३० मतदान केंद्राध्यक्ष, ३६०४ मतदान अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी १४०० अशा एकूण ६ हजार ६९८ कर्मचाऱ्यांना १२ एप्रिल रोजी प्रशिक्षण देण्यात आले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांनाही त्या-त्या तहसील कार्यालयाअंतर्गत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे.