शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

३९४ प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: July 15, 2017 23:45 IST

मानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ११ कलमी कार्यक्रम हाती घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ११ कलमी कार्यक्रम हाती घेतला. या अंतर्गत व्हॅर्मी कंपोस्टींग आणि नाडेफ कंपोस्टींगसाठी ३९४ प्रस्ताव मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाखल केले. मात्र अजूनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात कुशल रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच शाश्वत संसाधनाची निर्मिती करणे, या कारणामुळे ही योजना महत्त्वाची ठरली. या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे, सिंचन विहीर, शेततळे, फळबाग, गांडूळ खत, नाडेप खत, शोषखड्डे, रोपवाटिका, वृक्ष लागवड आदी कामांचा समावेश करुन राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना २०१६-१७ पासून प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतस्तरावर आणि यंत्रणा स्तरावर कामाचे नियोजन विभागीय आयुक्तांनी ठरवून दिले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली छाननी समिती रद्द केली. मानवत तालुक्यात कृषी विभागामार्फत फळबाग, गांडूळखत, नाडेप प्रकल्पासाठी १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत लाभार्थ्याची निवड करुन हे प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करण्यात आले. गांडूळ आणि नाडेपसाठी तब्बल ८०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले. तर फळबाग लागवडीसाठी ५०० प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र कृषी विभागाला मनरेगाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत स्वारस्य नसल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडून राहिले. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ११ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष कार्यक्रम मार्च महिन्यात राबविला. असे असले तरी कृषी विभागाकडून मात्र सार्वजनिक कामे करण्यात आली नाहीत. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या कामांनाही मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत.