शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

३५६ गावांना मिळणार मदत

By admin | Updated: April 17, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या रबीच्या ३५६ गावातील पिकांची अंतीम पैसेवारी १५ मार्च रोजी जाहीर झाली असून,

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या रबीच्या ३५६ गावातील पिकांची अंतीम पैसेवारी १५ मार्च रोजी जाहीर झाली असून, या गावांना जवळपास १०० कोटी रूपये नुकसानीपोटी मदत मिळण्याची शक्यता आहे़ याबाबत गुरूवारी शासनाचे आदेश निर्गमित झाले आहेत़प्रत्येक वर्षी अनेक गावे नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहत होती़ याबाबत आ़ पाटील यांनी रबीच्या पिकांच्या ३५६ गावांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता़ यानुसार अंतीम पैसेवारीच्या आधारावर दुष्काळी परिस्थितीतील विविध उपाययोजना या गावांना लागू करण्यात आलेल्या आहेत़ याबाबतचा शासन निर्णय गुरूवारी निर्गमीत झाला आहे़ त्यामुळे या गावांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दोन-तीन दिवसात शासनाचा निर्णय निर्गमीत होणे अपेक्षित आहे़ जिल्ह्यातील रबीच्या ३५६ गावातील १८३५१४ शेतकऱ्यांचे ३२९४८१ हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित झाले आहे़ रबी पिकांच्या नुकसानीपोटी शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ४५०० रूपये, बागायतीसाठी प्रति हेक्टरी ९००० रूपये व फळबागांसाठी प्रती हेक्टरी १२००० रूपये मदत मिळणार आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास १०० कोटी ५६ लाख रूपये मदत मिळणे अपेक्षित आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील ६९ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना १९ कोटी ९३ लाख, तुळजापूर: ४७ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना १३ कोटी ५० लाख, उमरगा : २१ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना ६ कोटी ९६ लाख, लोहारा: १० गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना २ कोटी, ९२ लाख, भूम : ९० गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना २२ कोटी २० लाख, परंडा : ९६ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना २९ कोटी तर वाशी : २३ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना ५ कोटी १४ लाख रूपये मदत मिळणार आहे़ तसेच गारपीटीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठीही आ. पाटील यांच्याकडून पाठपुरवा सुरू असल्याचे पत्रकात म्हटले आहे.(प्रतिनिधी)