शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

३४ जागी बोगस मतदान

By admin | Updated: October 21, 2014 01:14 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत.

सुनील कच्छवे , औरंगाबादविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणांत खऱ्या मतदारांना नंतर कागदी (प्रदत्त) मतपत्रिका देऊन मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी शांततेत मतदान झाले. निवडणुकीत बोगस प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदारांना सोबत ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले होते; पण तरीही काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुपारनंतर मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांना कुणी तरी आधीच त्यांच्या नावावर मतदान केल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा मतदारांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदारांकडे त्यांचे ओळखीचे पुरावे तपासून खातरजमा केली. तेव्हा खरोखरच दुसरेच कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मग मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडील कागदी मतपत्रिका देऊन त्यावर संबंधित मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक १४ ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार समोर आले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही १३ ठिकाणी प्रदत्त मतपत्रिकेचा वापर करावा लागला. शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये मात्र असा एकही प्रकार उघडकीस आला नाही. सिल्लोड २, फुलंब्री ३ आणि गंगापूर मतदारसंघात २ ठिकाणी असे प्रकार समोर आले. 1मतदान केंद्रांवर गेल्यावर एखाद्या मतदाराला त्याचे मतदान आधीच नोंदविले गेल्याचे आढळते. ते मतदान त्याच्याऐवजी कुणीतरी दुसऱ्यानेच केलेले असते. अशा प्रकरणात आधी खातरजमा केली जाते. खरोखरच तसे घडले असेल तर मग खऱ्या मतदाराला मतदान करू दिले जाते. 2मात्र, हे मतदान ईव्हीएमवर करणे शक्य नसते. त्यामुळे त्यासाठी आयोगाच्या सूचनांनुसार केंद्राध्यक्षांकडे काही कागदी मतपत्रिका दिलेल्या असतात. त्याला प्रदत्त मतपत्रिका म्हणतात. त्यावर मतदान करून घेतले जाते. 3मात्र, हे मतदान मोजणीच्या वेळी विचारात घेतले जात नाही, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.