शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

३४ जागी बोगस मतदान

By admin | Updated: October 21, 2014 01:14 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत.

सुनील कच्छवे , औरंगाबादविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणांत खऱ्या मतदारांना नंतर कागदी (प्रदत्त) मतपत्रिका देऊन मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी शांततेत मतदान झाले. निवडणुकीत बोगस प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदारांना सोबत ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले होते; पण तरीही काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुपारनंतर मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांना कुणी तरी आधीच त्यांच्या नावावर मतदान केल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा मतदारांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदारांकडे त्यांचे ओळखीचे पुरावे तपासून खातरजमा केली. तेव्हा खरोखरच दुसरेच कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मग मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडील कागदी मतपत्रिका देऊन त्यावर संबंधित मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक १४ ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार समोर आले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही १३ ठिकाणी प्रदत्त मतपत्रिकेचा वापर करावा लागला. शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये मात्र असा एकही प्रकार उघडकीस आला नाही. सिल्लोड २, फुलंब्री ३ आणि गंगापूर मतदारसंघात २ ठिकाणी असे प्रकार समोर आले. 1मतदान केंद्रांवर गेल्यावर एखाद्या मतदाराला त्याचे मतदान आधीच नोंदविले गेल्याचे आढळते. ते मतदान त्याच्याऐवजी कुणीतरी दुसऱ्यानेच केलेले असते. अशा प्रकरणात आधी खातरजमा केली जाते. खरोखरच तसे घडले असेल तर मग खऱ्या मतदाराला मतदान करू दिले जाते. 2मात्र, हे मतदान ईव्हीएमवर करणे शक्य नसते. त्यामुळे त्यासाठी आयोगाच्या सूचनांनुसार केंद्राध्यक्षांकडे काही कागदी मतपत्रिका दिलेल्या असतात. त्याला प्रदत्त मतपत्रिका म्हणतात. त्यावर मतदान करून घेतले जाते. 3मात्र, हे मतदान मोजणीच्या वेळी विचारात घेतले जात नाही, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.