शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

३४ जागी बोगस मतदान

By admin | Updated: October 21, 2014 01:14 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत.

सुनील कच्छवे , औरंगाबादविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणांत खऱ्या मतदारांना नंतर कागदी (प्रदत्त) मतपत्रिका देऊन मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी शांततेत मतदान झाले. निवडणुकीत बोगस प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदारांना सोबत ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले होते; पण तरीही काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुपारनंतर मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांना कुणी तरी आधीच त्यांच्या नावावर मतदान केल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा मतदारांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदारांकडे त्यांचे ओळखीचे पुरावे तपासून खातरजमा केली. तेव्हा खरोखरच दुसरेच कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मग मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडील कागदी मतपत्रिका देऊन त्यावर संबंधित मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक १४ ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार समोर आले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही १३ ठिकाणी प्रदत्त मतपत्रिकेचा वापर करावा लागला. शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये मात्र असा एकही प्रकार उघडकीस आला नाही. सिल्लोड २, फुलंब्री ३ आणि गंगापूर मतदारसंघात २ ठिकाणी असे प्रकार समोर आले. 1मतदान केंद्रांवर गेल्यावर एखाद्या मतदाराला त्याचे मतदान आधीच नोंदविले गेल्याचे आढळते. ते मतदान त्याच्याऐवजी कुणीतरी दुसऱ्यानेच केलेले असते. अशा प्रकरणात आधी खातरजमा केली जाते. खरोखरच तसे घडले असेल तर मग खऱ्या मतदाराला मतदान करू दिले जाते. 2मात्र, हे मतदान ईव्हीएमवर करणे शक्य नसते. त्यामुळे त्यासाठी आयोगाच्या सूचनांनुसार केंद्राध्यक्षांकडे काही कागदी मतपत्रिका दिलेल्या असतात. त्याला प्रदत्त मतपत्रिका म्हणतात. त्यावर मतदान करून घेतले जाते. 3मात्र, हे मतदान मोजणीच्या वेळी विचारात घेतले जात नाही, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.