शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

अवकाळीच्या नुकसानीला ३३ टक्क्यांचा निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:05 IST

सोयगाव : तालुक्यात झालेल्या चार दिवसांच्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या नुकसानीला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष अनिवार्य ...

सोयगाव : तालुक्यात झालेल्या चार दिवसांच्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या नुकसानीला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष अनिवार्य केला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचेच पंचनामे होणार आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यात बाधित क्षेत्राची आकडेवारी कमी करण्याचा शासनाचा हा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळलेल्या सोयगावला पुन्हा नवीन निकषाचे संकट उभे राहिले आहे.

सोयगाव तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाला. यामध्ये काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटकाही बसला आहे; परंतु या नुकसानीच्या पंचनाम्याला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष लावला आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या पाहणीतून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या काढल्या जात आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला विलंब होत असून, ३३ टक्क्यांचा निकष आणि ७२ तासांच्या जाचक अटीमुळे दोन्ही निकष शेतकऱ्यांना मारक ठरणारे आहेत.

तालुक्यात सोयगावसह ८४ महसुली गावांना अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे; परंतु शासन मात्र ३३ टक्क्यांच्या निकषावर अडून बसल्याने सोयगाव तालुक्याला अवकाळी आणि वादळी वारे, गारपिटीच्या मदतीतून वगळण्याची नवीन चाल शासन स्तरावर आखण्यात येत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे.

अवकाळीमुळे रबीच्या नुकसानीची महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून पाहणी केली जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १४ गावे बाधित असल्याचा कृषी विभागाचा अहवाल सादर झाला आहे.

-प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव