शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या नुकसानीला ३३ टक्क्यांचा निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:05 IST

सोयगाव : तालुक्यात झालेल्या चार दिवसांच्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या नुकसानीला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष अनिवार्य ...

सोयगाव : तालुक्यात झालेल्या चार दिवसांच्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या नुकसानीला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष अनिवार्य केला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचेच पंचनामे होणार आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यात बाधित क्षेत्राची आकडेवारी कमी करण्याचा शासनाचा हा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळलेल्या सोयगावला पुन्हा नवीन निकषाचे संकट उभे राहिले आहे.

सोयगाव तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाला. यामध्ये काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटकाही बसला आहे; परंतु या नुकसानीच्या पंचनाम्याला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष लावला आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या पाहणीतून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या काढल्या जात आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला विलंब होत असून, ३३ टक्क्यांचा निकष आणि ७२ तासांच्या जाचक अटीमुळे दोन्ही निकष शेतकऱ्यांना मारक ठरणारे आहेत.

तालुक्यात सोयगावसह ८४ महसुली गावांना अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे; परंतु शासन मात्र ३३ टक्क्यांच्या निकषावर अडून बसल्याने सोयगाव तालुक्याला अवकाळी आणि वादळी वारे, गारपिटीच्या मदतीतून वगळण्याची नवीन चाल शासन स्तरावर आखण्यात येत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे.

अवकाळीमुळे रबीच्या नुकसानीची महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून पाहणी केली जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १४ गावे बाधित असल्याचा कृषी विभागाचा अहवाल सादर झाला आहे.

-प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव