शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १०० तपासण्यांमध्ये ३२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० नागरिकांच्या केलेल्या तपासणीत तब्बल ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १५ वरून थेट ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने पसरतो आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, रिकव्हरी रेट अर्थातच कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० टक्क्यांपर्यंत खालावल्याने चिंता वाढली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा शहरात उद्रेक झाला. दिनांक १ मार्चपासून कोरोना रूग्णांमध्ये सतत वाढ होत चालली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात दररोज २० ते २५ कोरोना रूग्ण आढळून येत होते. मात्र, मागील तीन आठवड्यांत जिल्ह्यात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण सापडत असल्याने केंद्र व राज्य सरकारनेही औरंगाबादेतील वाढत्या रूग्णसंख्येवर चिंता व्यक्‍त केली आहे. शनिवारी जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक तब्बल १,६७९ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद शहरातील १,२१७ कोरोनाचे नवीन रूग्ण होते. महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहराचा शनिवारच्या कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट तब्बल ३२ टक्के एवढा नोंदवला गेला आहे. म्हणजेच १०० कोरोना चाचण्यांमागे ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट ठरला असून, आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्‍त केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १० हजार ४५८ सक्रिय रूग्ण असून, यापैकी ८ हजार १४० रूग्ण शहरातील आहेत, हे विशेष. त्यांना उपचार सेवा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाचा संसर्ग याच गतीने वाढत राहिल्यास शहरातील परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

मृत्यूदर वाढल्याने रिकव्हरी रेट घटला

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बाधित रूग्णांमधील मृतांमध्येही वाढ होत आहे. मागील तीनच दिवसात जिल्ह्यात ४० बाधितांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मृतांचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेटदेखील कमी झाला आहे. यापूर्वी शंभर टक्क्यांवर असलेला शहराचा रिकव्हरी रेट हा शनिवारी ८०.२६१ टक्के एवढा नोंदवला गेला.

तब्बल अडीच हजार रूग्ण घरीच

शहरातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी खाटांच्या कमतरतेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना त्यांच्या घरीच गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत तब्बल २ हजार ६१७ रूग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.