शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

शहरात १०० तपासण्यांमध्ये ३२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० नागरिकांच्या केलेल्या तपासणीत तब्बल ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १५ वरून थेट ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने पसरतो आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, रिकव्हरी रेट अर्थातच कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० टक्क्यांपर्यंत खालावल्याने चिंता वाढली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा शहरात उद्रेक झाला. दिनांक १ मार्चपासून कोरोना रूग्णांमध्ये सतत वाढ होत चालली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात दररोज २० ते २५ कोरोना रूग्ण आढळून येत होते. मात्र, मागील तीन आठवड्यांत जिल्ह्यात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण सापडत असल्याने केंद्र व राज्य सरकारनेही औरंगाबादेतील वाढत्या रूग्णसंख्येवर चिंता व्यक्‍त केली आहे. शनिवारी जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक तब्बल १,६७९ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद शहरातील १,२१७ कोरोनाचे नवीन रूग्ण होते. महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहराचा शनिवारच्या कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट तब्बल ३२ टक्के एवढा नोंदवला गेला आहे. म्हणजेच १०० कोरोना चाचण्यांमागे ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट ठरला असून, आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्‍त केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १० हजार ४५८ सक्रिय रूग्ण असून, यापैकी ८ हजार १४० रूग्ण शहरातील आहेत, हे विशेष. त्यांना उपचार सेवा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाचा संसर्ग याच गतीने वाढत राहिल्यास शहरातील परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

मृत्यूदर वाढल्याने रिकव्हरी रेट घटला

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बाधित रूग्णांमधील मृतांमध्येही वाढ होत आहे. मागील तीनच दिवसात जिल्ह्यात ४० बाधितांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मृतांचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेटदेखील कमी झाला आहे. यापूर्वी शंभर टक्क्यांवर असलेला शहराचा रिकव्हरी रेट हा शनिवारी ८०.२६१ टक्के एवढा नोंदवला गेला.

तब्बल अडीच हजार रूग्ण घरीच

शहरातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी खाटांच्या कमतरतेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना त्यांच्या घरीच गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत तब्बल २ हजार ६१७ रूग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.