लातूर : महसूल कार्यालयाअंतर्गत राखीव दहा जागांसाठी रविवारी सकाळी ११ ते १ या कालावधीत घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी १३१५ उमेदवारांपैकी ९९३ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३१९ उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत राखीव १० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये १० जागांसाठी १३१५ अर्ज महसूल विभागाकडे दाखल करण्यात आले. त्यादृष्टीने परीक्षेच्या नियोजनासाठी आस्थापना शाखेतील १०० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये केंद्र प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांवर तीन परीक्षा केंद्रावरील जबाबदारी देण्यात आली होती. दयानंद महाविद्यालयातील दोन व देशिकेंद्र शाळेतील एका केंद्राचा समावेश होता. रविवारी सकाळी ११ ते १ या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेला ७० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. १३१५ विद्यार्थ्यांपैकी ९९३ विद्यार्थ्यांनी तलाठी पदाची परीक्षा दिली. तर उर्वरित ३१९ उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात ही परीक्षा शांततेत झाली असून, १३१५ पैकी ३१९ उमेदवार गैरहजर राहिले. तर ९९३ उमेदवारांनी तलाठी पदाची परीक्षा दिली आहे. (प्रतिनिधी) आक्षेपासाठी अवधी... तलाठी पदाच्या रविवारी झालेल्या परीक्षेबाबत काही उमेदवारांचा आक्षेप असेल, तर त्यांच्यासाठी सोमवारी ११ वाजेपर्यंत आक्षेप अर्ज देण्याची संधी दिली आहे. आॅनलाईन उत्तरपत्रिका टाकण्यात आली असून, ती उत्तरपत्रिका परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी पाहून याबाबत आक्षेप नोंदविता येतील.
३१९ उमेदवार परीक्षेला गैरहजर
By admin | Updated: September 14, 2015 00:42 IST