शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

३० टक्के पाणी

By admin | Updated: May 29, 2014 00:21 IST

परभणी : उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणातही यावर्षी जिल्ह्यात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील १० ते १५ वर्षांच्या तुलनेत अशी परिस्थिती निर्माण झाली

परभणी : उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणातही यावर्षी जिल्ह्यात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील १० ते १५ वर्षांच्या तुलनेत अशी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील नागरिकांची पाणीटंचाईपासून मुक्तता झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाटते. पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता उन्हाळा सुरु होण्यापूर्वी पाण्याचे नियोजन केले जाते. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वरचेवर वाढत जाते आणि उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात चातकासारखी पावसाची वाट पाहिली जाते. त्यामुळे पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याची भावना जिल्हावासियांची झालेली आहे. परंतु, हे वर्ष याला अपवाद ठरले. जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवली नाही. काही गावांमध्ये पाण्याची समस्या असेलही. परंतु, ती पाणी नसल्याने नव्हे, तर नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे काही भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. गतवर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे आणि सिंचन तलाव पाण्याने डबडबले होते. येलदरीसारखे मोठे धरणही १०० टक्के भरले होते. तसेच छोटे-मोठे तलाव, तळे, विहिरी, बंधारेदेखील पाण्याने भरलेले असल्यामुळे यावर्षी पाणीटंचाईने धूम ठोकली होती. जलस्त्रोतांमध्ये पाणी असल्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी देखील अल्पशी घटली. विहिरी आणि हातपंपाना अजूनही पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्तता मिळाली. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातील करपरा आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांत मिळून ३७ टक्के पाणीसाठा आहे. करपरा प्रकल्पामध्ये ६.४० दलघमी पाणी आहे. तर मासोळी प्रकल्पात ४७ टक्के म्हणजे १२.७ दलघमी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी या दोन्ही प्रकल्पात मिळून केवळ १२ टक्के पाणी शिल्लक होते. जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत. या लघूप्रकल्पामध्ये १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मागील वर्षी याच दिवसांत केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चार प्रकल्प जोत्याखाली मध्यम आणि लघूप्रकल्पांपैकी चार लघूप्रकल्पामधील पाणी जोत्याखाली आहे. तर १२ लघूप्रकल्पांमध्ये ० ते २५ टक्के, चार प्रकल्पामध्ये २६ ते ५० टक्के आणि २ प्रकल्पामध्ये ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.