शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

३० टक्के ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

सोमनाथ खताळ , बीड बदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते

सोमनाथ खताळ , बीडबदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते. १० टक्के ग्राहक मात्र बँकिंग व्यवहारात परिपूर्ण आहेत. ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, इतरांच्या मदतीने केलेले आर्थिक व्यवहार अनेकांच्या अंगलट आले. त्यामुळे बँकिंग ज्ञान वाढविण्याची गरज असल्याचा निष्कर्ष निघाला.पंतप्रधानांनी गरीबांचेही बँकेत खाते असावे, या उदात्त हेतूने जनधन योजना सुरू केली. मात्र, अनेकांना बँकेते खाते कसे खोलायचे ? पैसे खात्यावर कसे भरायचे ? कसे काढायचे ? धनाकर्ष, धनादेश म्हणजे काय ? हेच माहीत नाही. त्यामुळे जनधन सारख्या कितीही योजना आल्या तरी ग्राहकांचे बँकिंग ज्ञान ‘झिरो’ असेल तर या योजनांचा हेतू साध्य होणे शक्य नाही. अनेक ग्राहक तासनतास बँकांच्या पायऱ्यावर ताटकळतात, शिवाय अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात, असे अनुभव ग्रामीण ग्राहक बोलून दाखवितात.३० टक्के ग्राहक पेनाशिवाय बँकेतबँकेत यायचे म्हटले की पेन सोबत असणे गरजेचे आहे, मात्र सोबत पेन बाळगणे ३० टक्के लोकांना नकोसे वाटले तर ७० टक्के लोक स्वत:चा पेन घेऊन आले. स्लीप भरण्यासाठी अथवा बँकेत इतर अर्ज भरण्यासाठी ग्राहक दुसऱ्यांकडेच हात पसरत असल्याचे दिसून आले. काम झाल्यानंतर पेन परत देण्याऐवजी तसाच खिशाला अडकवण्याचे प्रकारही दिसून आले.अज्ञान पडतेय महागातआज अनेकांना बँकेचे व्यवहार कशाप्रकारे चालतात, आणि त्याचे काय नियम असतात, याची माहिती नसल्याने फसवाफसवीचे प्रकार घडतात, हे वास्तव आहे. मात्र बँकांनाही व्यवहाराच्या जनजागृतीसाठी वेळ नाही.