शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

३ हजार क्विंटल धान्य गायब

By admin | Updated: August 9, 2014 00:29 IST

पुन्हा एकदा जिंतूर तालुक्यात धान्य घोटाळा समोर आला आहे.

विजय चोरडिया जिंतूरअन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिल्लक धान्य कोटा सर्वसामान्य नागरिकांना वाटण्याऐवजी स्वस्तधान्य दुकानदार, पुरवठा विभाग व धान्य दलालांच्या साखळीने सुमारे ३ हजार क्विंटल धान्य काळ्या बाजारात गेल्याचे समजते. यामुळे पुन्हा एकदा जिंतूर तालुक्यात धान्य घोटाळा समोर आला आहे.जिंतूर तालुक्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मार्च ते जुलै या महिन्यात शिल्लक धान्य कोटा देण्यात आला. मार्च ते जुलै या महिन्यात प्रति कार्डावर सरासरी २५ क्विंटल धान्य देण्यात आले. परंतु, नियमाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात धान्य देणे गरजेचे आहे. लोकसंख्या व कार्ड संख्या यांच्या सरासरीवर सुमारे ३ हजार क्विंटल धान्याचा शिल्लक कोटा जिंतूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये १५०० क्विंटल गहू व १५०० क्विंटल तांदूळ याचा समावेश होता. काही लाभार्थ्यांना या पाच महिन्यात धान्य मिळाले नव्हते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बरेच लाभार्थी वंचित राहिले होते. त्यांचा शिल्लक असलेला धान्य कोटा ग्रामीण भागापर्यंत पोहचण्याऐवजी दलालाच्या साखळीने हा धान्य कोटा स्वस्तधान्य दुकानदारांशी हाताशी धरुन खरेदी केला. विशेष म्हणजे दलालांच्या साखळीने स्वस्तधान्य दुकानदारांना बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देऊन हा माल खरेदी केल्याने दुकानदारांनाही मोठा आर्थिक लाभ झाला. मागील महिन्यात रमजान हा सण असताना व गोदामात धान्य उपलब्ध असतानाही उशिराने धान्य वाटप करुन काळ्या बाजारात धान्य विक्रीस पुरवठा विभागाने हातभार लावला आहे.एकाच दिवसात पाचशे क्विंटल धान्य गायबअन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिल्लक धान्य कोट्यातील ७ आॅगस्ट रोजी ३५० क्विंटल गहू व २२५ क्विंटल तांदूळ गोदामातून उचलण्यात आला. त्यापैकी केवळ २५ क्विंटल धान्यच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्याची माहिती हाती आली आहे. तसेच २५ ते ३१ जुलै दरम्यान ८०० क्विंटल गहू व ९०० क्विंटल तांदळाची उचल करण्यात आली. यातील बहुतांश माल दलालाने गोदामातच खरेदीे करुन परस्पर लांबविला.