शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

वर्षभरात रस्ते अपघातांत २५१ जणांचा मृत्यू

By admin | Updated: December 28, 2014 01:15 IST

बाळासाहेब जाधव , लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात २५० जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांचा विकास होत नाही़ शिवाय

बाळासाहेब जाधव , लातूरजिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात २५० जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांचा विकास होत नाही़ शिवाय, रस्तेही खराब झाले आहेत़ खराब अन् अपुऱ्या रस्त्याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे़ अनेकदा मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ लातूर शहरासह जिल्हाभरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु या वाहनधारकांना प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या रस्त्याची मात्र दुरावस्था झाली आहे़ शहरासह कुठल्याही तालुक्यात प्रवास केला तरी रस्त्याची दूरवस्था मात्र पहावयास मिळणार आहे़ खराब रस्ते अन् मद्यपी चालकांच्या चुकीमुळे वर्षभरात ५९ अपघात झाले आहेत़ पोलिस दप्तरी केवळ मोठ्या अपघातांची नोंद असून किरकोळ अपघात तर दररोजच होतात़ मोठ्या अपघातात जानेवारी ते डिसेंबर महिन्यात २५१ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे़ फेब्रुवारी मध्ये ६८ अपघात, मार्च-७६, एप्रिल-६४, मे-७२, जून-६७, जुलै-५५, आॅगस्ट-४१, सप्टेंबर- ३९, आॅक्टोबर-४९, नोव्हेंबर-४६, डिसेंबर अखेरपर्यंत ६४२ अपघात झाले आहेत़ या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसताना अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २३६ प्रासंगिक अपघात झाले़ तर गंभीर अपघात २३० झाले़ तर किरकोळ अपघातांची संख्या १३० वर गेली आहे़ एकूण अपघातामध्ये गंभीर जखमींचा आकडा ७२१ वर गेला आहे़ तर मृतांची संख्या २५१ झाली आहे़ लातूर ते नांदेड मार्गावरील लातूर जिल्हा हद्दीपर्यंतचा रस्ता खड्डेमय आहे़ शिवाय लातूर ते औसा या मार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने या मार्गावर दैनंदिन अपघात होतात़ शिवाय , चाकूर तालुक्यातील चापोलीनजीक रस्त्याची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहे़ त्यामुळे अपघाताच्या निमित्ताने रस्ते दुरूस्तीची मागणी होत आहे़ ४वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्या प्रमाणात अपुरे रस्ते, आहे त्या रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे़ त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ वर्षभरामध्ये सर्वाधिक अपघात मे महिन्यात झाले़ तर जून महिन्यात सर्वाधिक ३२ जणांचा मृत्यू अपघातामुळे झाल्याची प्रशासन दप्तरी नोंद आहे़ ४लातूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत़ अनेक रस्त्यांवर मोठमोठी खड्डे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्ती होत नाही़ वाहनधारकांची ओरड वाढल्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते़ औसा ते लातूर चौपदरी रस्ता अनेक दिवसांपासून रखडला आहे़ कामासाठी रस्ता खोदण्यात आला, मात्र तो बुजविण्यात आला नसल्याने या मार्गावर अपघात वाढले आहेत़