शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

वर्षभरात रस्ते अपघातांत २५१ जणांचा मृत्यू

By admin | Updated: December 28, 2014 01:15 IST

बाळासाहेब जाधव , लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात २५० जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांचा विकास होत नाही़ शिवाय

बाळासाहेब जाधव , लातूरजिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात २५० जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांचा विकास होत नाही़ शिवाय, रस्तेही खराब झाले आहेत़ खराब अन् अपुऱ्या रस्त्याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे़ अनेकदा मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ लातूर शहरासह जिल्हाभरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु या वाहनधारकांना प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या रस्त्याची मात्र दुरावस्था झाली आहे़ शहरासह कुठल्याही तालुक्यात प्रवास केला तरी रस्त्याची दूरवस्था मात्र पहावयास मिळणार आहे़ खराब रस्ते अन् मद्यपी चालकांच्या चुकीमुळे वर्षभरात ५९ अपघात झाले आहेत़ पोलिस दप्तरी केवळ मोठ्या अपघातांची नोंद असून किरकोळ अपघात तर दररोजच होतात़ मोठ्या अपघातात जानेवारी ते डिसेंबर महिन्यात २५१ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे़ फेब्रुवारी मध्ये ६८ अपघात, मार्च-७६, एप्रिल-६४, मे-७२, जून-६७, जुलै-५५, आॅगस्ट-४१, सप्टेंबर- ३९, आॅक्टोबर-४९, नोव्हेंबर-४६, डिसेंबर अखेरपर्यंत ६४२ अपघात झाले आहेत़ या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसताना अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २३६ प्रासंगिक अपघात झाले़ तर गंभीर अपघात २३० झाले़ तर किरकोळ अपघातांची संख्या १३० वर गेली आहे़ एकूण अपघातामध्ये गंभीर जखमींचा आकडा ७२१ वर गेला आहे़ तर मृतांची संख्या २५१ झाली आहे़ लातूर ते नांदेड मार्गावरील लातूर जिल्हा हद्दीपर्यंतचा रस्ता खड्डेमय आहे़ शिवाय लातूर ते औसा या मार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने या मार्गावर दैनंदिन अपघात होतात़ शिवाय , चाकूर तालुक्यातील चापोलीनजीक रस्त्याची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहे़ त्यामुळे अपघाताच्या निमित्ताने रस्ते दुरूस्तीची मागणी होत आहे़ ४वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्या प्रमाणात अपुरे रस्ते, आहे त्या रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे़ त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ वर्षभरामध्ये सर्वाधिक अपघात मे महिन्यात झाले़ तर जून महिन्यात सर्वाधिक ३२ जणांचा मृत्यू अपघातामुळे झाल्याची प्रशासन दप्तरी नोंद आहे़ ४लातूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत़ अनेक रस्त्यांवर मोठमोठी खड्डे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्ती होत नाही़ वाहनधारकांची ओरड वाढल्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते़ औसा ते लातूर चौपदरी रस्ता अनेक दिवसांपासून रखडला आहे़ कामासाठी रस्ता खोदण्यात आला, मात्र तो बुजविण्यात आला नसल्याने या मार्गावर अपघात वाढले आहेत़