शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

रक्षाबंधनाच्या २५० गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:54 IST

महावीर भवन येथे आयोजित सामुहिक रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे २५० बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधली हा सोहळा पाहण्यासाठी जैन समाजबांधवांनी गर्दी केली होती. 

ठळक मुद्देया सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे २५० बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधलीतारामती बाफना अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  ‘गुरुदेव आम्हे दया करो’ हे गीत सादर करुन सर्वांची मने जिंक़ली.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ६ :  ‘आयुष्यात माझ्याकडून तुझ्या बदल कटू शब्द निघाले असतील, तर मला माफ कर,’ असे म्हणत बहिणींनी आपल्या भाऊरायाला राखी बांधली. ‘ कितीही संकट आले तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे मी उभे राहिल व आयुष्यभर तुझे संरक्षण करील’ असे वचन भावाने आपल्या लाडक्या बहिणीला दिले. या आनंदात बहिणीनेही बंधुला मिठाईचा घास भरविला. हा प्रसंग कोणत्या घरातील नव्हता तर महावीर भवन येथे आयोजित सामुहिक रक्षाबंधन सोहळ्यातील होता. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे २५० बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधली हा सोहळा पाहण्यासाठी जैन समाजबांधवांनी गर्दी केली होती. 

वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने रविवारी ६ रोजी सामुहिक रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मपीठावर विवेकमुनीजी म.सा. आदिठाणा ५ यांची उपस्थिती होती. प्रारंभी, जास्तीत जास्त तपआराधना करण्याचा संकल्प करणा-या महिलांनी संकल्प रुपी राखी विवेकमुनीजी म.सा. गौरवमुनीजी म.सा. संभवमुनीजी म.सा., सौरभमुनीजी म.सा, प्रणवमुनीजी म.सा. यांना दिली. यानंतर अवघ्या ५ वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंतचे २५० भाऊराया चार रांगेत बसले. त्यांच्या समोर बहिणी बसल्या. प्रथम या बहिणींनी भाऊरायाला टिळा लावला यानंतर त्यांच्या हातात राखी बांधली. भाऊरायाने बहिणीला भेटवस्तू दिली. यानंतर मिठाईने बहिणींनी मिठाईने भावाचे तोंड गोड केले. प्रारंभी, गौरवमुनीजी म.सा. यांनी एका भाऊ-बहिणीची कथा सांगितली. त्यावेळीस सर्व भाविक भारावून गेले होते. यावेळी थाळी सजावट स्पर्धाही घेण्यात आली. धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व गुरूमिश्री युवा मंडळ व प्रभा कन्या मंडळाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ताराचंद बाफना यांनी तर अध्यक्ष प्रकाश बाफना यांनी आभार मानले. 

अंध मुलांनी मनेजिंकली महावीर भवन येथील रक्षाबंधन सोहळ्यात तारामती बाफना अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  ‘गुरुदेव आम्हे दया करो’ हे गीत सादर करुन सर्वांची मने जिंक़ली.  यानंतर उपस्थिती मुलींनी व महिलांनी या मुलांना राखीबांधली. यामुळे भारावून गेलेल्या मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.