शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात २४.३५ मिली मीटर पाऊस !

By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरीच्या २४.३५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक ३३.६० मिमी नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरीच्या २४.३५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक ३३.६० मिमी नोंद झाली आहे. सदरील पावसामुळे प्रकल्पांतील पाणीपातळीत फारसा फरक पडणार नसला तरी खरीप पिकांना मात्र, जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. जिल्हाभरात मिळून आजवर ३०.५ टक्के एवढा पाऊस पडला आहे. अधून-मधून पडणाऱ्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळत असून पिकांची वाढही चांगली झाली आहे. परंतु, दुसरीकडे पाण्याचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. जिल्हाभरातील शंभरावर प्रकल्पांमध्ये अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही पाणीसाठा झालेला नाही. चक्के हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. उर्वरित प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. मागील चोवीस तासात म्हणजेच रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्हाभरात मिळून २४.३५ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद भूम तालुक्यात झाली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखलेल्या भूमध्ये ३३.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर वाशी तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. २९ मिमी एवढी नोंद झाली आहे. दरम्यान, यंदा तुळजापूर तालुक्यावरही पावसाची चांगली कृपादृष्टी आहे. २८.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यमानाचा विचार करता तुळजापूर तालुक्यात झालेल्या पर्जन्यमानाच्या टक्केवारीने चाळीशी ओलांडली आहे. तुळजापूर वगळता एकही तालुका चाळीशीही गोठू शकलेला नाही. परंडा तालुक्यातही २८.४० मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर उमरगा २४.४० मिमी, लोहारा १६.६७ मिमी, कळंब १७.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिना सरत आला असतानाही जिल्ह्याचा काही भाग वगळता, दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आजही जिल्हाभरातील विविध गावांत मिळून सुमारे २०९ टँकर सुरू आहेत. अधिग्रहणांची संख्याही एक हजारावर आहे. पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांच्या नजराही आता आभाळाकडे लागल्या आहेत.