शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

जिल्हाभरात २४.३५ मिली मीटर पाऊस !

By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरीच्या २४.३५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक ३३.६० मिमी नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरीच्या २४.३५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक ३३.६० मिमी नोंद झाली आहे. सदरील पावसामुळे प्रकल्पांतील पाणीपातळीत फारसा फरक पडणार नसला तरी खरीप पिकांना मात्र, जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. जिल्हाभरात मिळून आजवर ३०.५ टक्के एवढा पाऊस पडला आहे. अधून-मधून पडणाऱ्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळत असून पिकांची वाढही चांगली झाली आहे. परंतु, दुसरीकडे पाण्याचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. जिल्हाभरातील शंभरावर प्रकल्पांमध्ये अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही पाणीसाठा झालेला नाही. चक्के हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. उर्वरित प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. मागील चोवीस तासात म्हणजेच रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्हाभरात मिळून २४.३५ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद भूम तालुक्यात झाली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखलेल्या भूमध्ये ३३.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर वाशी तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. २९ मिमी एवढी नोंद झाली आहे. दरम्यान, यंदा तुळजापूर तालुक्यावरही पावसाची चांगली कृपादृष्टी आहे. २८.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यमानाचा विचार करता तुळजापूर तालुक्यात झालेल्या पर्जन्यमानाच्या टक्केवारीने चाळीशी ओलांडली आहे. तुळजापूर वगळता एकही तालुका चाळीशीही गोठू शकलेला नाही. परंडा तालुक्यातही २८.४० मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर उमरगा २४.४० मिमी, लोहारा १६.६७ मिमी, कळंब १७.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिना सरत आला असतानाही जिल्ह्याचा काही भाग वगळता, दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आजही जिल्हाभरातील विविध गावांत मिळून सुमारे २०९ टँकर सुरू आहेत. अधिग्रहणांची संख्याही एक हजारावर आहे. पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांच्या नजराही आता आभाळाकडे लागल्या आहेत.