शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

भाजलेल्या २४ टक्के रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: July 22, 2014 00:10 IST

विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़

विलास चव्हाण, परभणीयेथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़ तर ७६ टक्के रुग्णांचा प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले़आई, वडिलांनी मुलांना अथवा पतीने पत्नीला रागावल्याने रागाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेणे तसेच पेटता देवा अंगावर पडणे तसेच स्टोव्हच्या भडक्यामुळे मार्च २०१३-१४ या वर्षभरात परभणी जिल्हा रुग्णालयात ३८१ जळीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते़ त्यापैकी उपचारादरम्यान ९४ रुग्णांचा मृत्यू झाला तर २८६ रुग्णांवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्टरांना यश आले़ वर्षभरामध्ये ३८१ रुग्ण या ना त्या कारणाने भाजले होते़ रुग्णालयात हा एवढा मोठा आकडा पहायला तर मोठा आहेच शिवाय खाजगी रुग्णालयामध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ वर्षभरात हजाराच्या जवळपास हा आकडा असेल़ घरातील क्षुल्लक कारणामुळे अनेक जण स्वत:ला पेटवून घेण्याच्या घटना वाढत आहेत़ यासाठी शासनस्तरावरून जनजागृती करणे गरजेचे आहे़ मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे अनमोल जीव क्षुल्लक कारणामुळे गमवावे लागत आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ पैसे घेऊन केली जाते मलमपट्टी येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागातील परिचारिकांनी जळीत रुग्णांची मलमपट्टी करणे गरजेचे असते़ परंतु, येथे शिपाईच मलमपट्टी करण्यासाठी २०० ते ३०० रुपये रुग्णांकडून घेतात़ यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे़ पैसे नाही दिले तर मलमपट्टी तुम्हीच करा असे उद्धटपणे बोलले जाते़ रुग्णांचे नातेवाईक नाईलाजास्तव पैसे देतात़ याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे़ जळीत वार्डामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांचा अभाव आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णांवर उपचार केले जातात़ अनेकांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़ तसेच खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना रुग्णांच्या उपचारासाठी बोलावले असता, हे डॉक्टर उपचारासाठी येत नाहीत़ त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे़, असे डॉ़ प्रकाश डाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ येथील जिल्हा रुग्णालयात जळीत विभागात खाटांची संख्या २० आहे़ हा वार्ड वातानुकूलित आहे़ येथील जळीत वार्डात अनेक महिन्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे़ त्यामुळे जळीत रुग्णांना योग्य प्रकारे उपचार करणे अवघड झाले आहे़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे़ तालुका व ग्रामीण भागातील रुग्णालयात जळीत रुग्णांसाठी सुविधांचा अभाव आहे़ त्यामुळे काही रुग्ण उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू पावतात़ तज्ज्ञ डॉक्टर व सुविधा आवश्यक आहेत़ मार्च२४एप्रिल२३मे २१जून१७जुलै२५आॅगस्ट२०सप्टें१४आॅक्टो१७नोव्हें२९डिसेंबर२३जाने़ २५फेब्रु़२१मार्च२७