शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

२४ कोटींचे निधी वितरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़राज्य शासनाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ यावर्षी परभणी जिल्हा परिषदेसाठी या अंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी ३ महिन्यांपूर्वी उपलब्ध झाला़ जि़प़च्या विषय समित्या गठीत झाल्या नसल्याने या निधीचे वितरण गेल्या महिन्यापर्यंत करता येत नव्हते़ परंतु, आॅगस्टच्या प्रारंभी विषय समित्यांच्या निवडी झाल्या़ त्यानंतर समितीची बैठक घेऊन तातडीने निधी खर्चाचे नियोजन करणे आवश्यक होते़ याकरीता संबंधित गावांची निवड करून याबाबतचे विकास आराखडे तयार करणे व त्या विकास आराखड्यात मान्यता देवून निधीची मागणी करणे गरजेचे असताना जिल्हा परिषद सदस्यांमधील अंतर्गत वादातून ही सर्व प्रक्रिया प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे़ जि़प़च्या समाजकल्याण समितीची ११ सप्टेंबर रोजी बैठक झाली़या बैठकीत या निधी वितरणाबाबत चर्चाही झाली़ परंतु, निर्णय मात्र झाला नाही़ परिणामी हा निधी सध्या पडून आहे़ निधी पडून राहण्यामागे सदस्यांमध्ये निधी मिळविण्यावरून निर्माण झालेली स्पर्धा कारण असल्याचे समजते़ समाजकल्याण समितीवरच्या सदस्यांना अधिक निधी हवा आहे तर अन्य काही पदाधिकारी व सदस्यांनी अधिक निधीची मागणी केली आहे़ गेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या वेळी काही भागांमध्ये त्या भागातील समाजकल्याण सभापती असताना अधिक निधी गेला होता़ त्या भागात आता कमी निधी द्यावा, अशी काही सदस्यांची भूमिका आहे़ परंतु, त्या भागातील समितीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत़ यामुळे या निधीचे वितरण होवू शकलेले नाही़निधी वितरणाच्या अनुषंगाने काही जि़प़ सदस्य, पदाधिकारी व महिला पदाधिकाºयांच्या पतींच्या बैठकींमध्ये अनौपचारिकरित्या निधी वाटपाबाबत निर्णय झाला़ परंतु, त्या निर्णयाला मूर्त स्वरुप येऊ शकले नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा हा निधी प्रलंबित राहिला आहे़ परिणामी या निधीतून करण्यात येणाºया विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़