शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

२४ कोटींचे निधी वितरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़राज्य शासनाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ यावर्षी परभणी जिल्हा परिषदेसाठी या अंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी ३ महिन्यांपूर्वी उपलब्ध झाला़ जि़प़च्या विषय समित्या गठीत झाल्या नसल्याने या निधीचे वितरण गेल्या महिन्यापर्यंत करता येत नव्हते़ परंतु, आॅगस्टच्या प्रारंभी विषय समित्यांच्या निवडी झाल्या़ त्यानंतर समितीची बैठक घेऊन तातडीने निधी खर्चाचे नियोजन करणे आवश्यक होते़ याकरीता संबंधित गावांची निवड करून याबाबतचे विकास आराखडे तयार करणे व त्या विकास आराखड्यात मान्यता देवून निधीची मागणी करणे गरजेचे असताना जिल्हा परिषद सदस्यांमधील अंतर्गत वादातून ही सर्व प्रक्रिया प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे़ जि़प़च्या समाजकल्याण समितीची ११ सप्टेंबर रोजी बैठक झाली़या बैठकीत या निधी वितरणाबाबत चर्चाही झाली़ परंतु, निर्णय मात्र झाला नाही़ परिणामी हा निधी सध्या पडून आहे़ निधी पडून राहण्यामागे सदस्यांमध्ये निधी मिळविण्यावरून निर्माण झालेली स्पर्धा कारण असल्याचे समजते़ समाजकल्याण समितीवरच्या सदस्यांना अधिक निधी हवा आहे तर अन्य काही पदाधिकारी व सदस्यांनी अधिक निधीची मागणी केली आहे़ गेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या वेळी काही भागांमध्ये त्या भागातील समाजकल्याण सभापती असताना अधिक निधी गेला होता़ त्या भागात आता कमी निधी द्यावा, अशी काही सदस्यांची भूमिका आहे़ परंतु, त्या भागातील समितीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत़ यामुळे या निधीचे वितरण होवू शकलेले नाही़निधी वितरणाच्या अनुषंगाने काही जि़प़ सदस्य, पदाधिकारी व महिला पदाधिकाºयांच्या पतींच्या बैठकींमध्ये अनौपचारिकरित्या निधी वाटपाबाबत निर्णय झाला़ परंतु, त्या निर्णयाला मूर्त स्वरुप येऊ शकले नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा हा निधी प्रलंबित राहिला आहे़ परिणामी या निधीतून करण्यात येणाºया विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़