शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

२२५ तलावांना गळती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:05 IST

उस्मानाबाद :जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे.

उस्मानाबाद : तीन ते चार वर्षानंतर जिल्हाभरात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव अन् प्रमुख मोठे प्रकल्पही शंभर टक्के भरले. त्यामुळे बळीराजासह ग्रामस्थ सुखावले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील ३५ ते ४० वर्षांपासून या प्रकल्पासाठी शासनाने छदामही उपलब्ध करून दिलेला नसल्याने दुरुस्ती झालेली नाही. प्रकल्पांची पाणीगळती वेळीच न रोखल्यास संबंधित प्रकल्प पूर्णक्षमतेने भरूनही भविष्यात ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागेल !जिल्हाभरातील बहुतांश पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव १९७०-७२ च्या कालावधीत बांधण्यात आले आहेत. मजुरांची गरज लक्षात घेऊन ही कामे करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांच्या बाबतीत तांत्रिक घटक फारसे पाहिलेले नाहीत. दरम्यान, प्रकल्प उभारल्यानंतर किमान दर दहा वर्षांनी त्याची डागडुजी करणे अपेक्षित असते. यामध्ये प्रकल्पाच्या पायातून होणारी गळती थांबविणे, खचलेल्या सांडव्यांची दुरुस्ती करणे, चिबड चारी दुरुस्त करणे आदी कामे करणे अपेक्षित असते. परंतु, मागील ३५ ते ४० वर्षांच्या कालावधीत या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले गेले. दुरुस्तीसाठी छदामही मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे हे प्रकल्प कोरडेठाक होते. हे प्रकल्प दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ होती. परंतु, तसे झाले नाही. दरम्यान, जिल्ह्यात यंदा परतीच्या पवासाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे विशेषत: पाझर तलाव, सिंचन तलाव, गाव तलाव तुडूंब भरले. परंतु, सव्वादोनशेवर प्रकल्प गळके असल्याने पाणी वाया जात आहे. सदरील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला असता, तर हे प्रकल्प आज सुस्थितीत राहिले असते. आणि पाणीही वाया गेले नसते, अशी प्रतिक्रीया संबंधित धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांतून उमटू लागली आहे.