शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

२२५ तलावांना गळती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:05 IST

उस्मानाबाद :जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे.

उस्मानाबाद : तीन ते चार वर्षानंतर जिल्हाभरात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव अन् प्रमुख मोठे प्रकल्पही शंभर टक्के भरले. त्यामुळे बळीराजासह ग्रामस्थ सुखावले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील ३५ ते ४० वर्षांपासून या प्रकल्पासाठी शासनाने छदामही उपलब्ध करून दिलेला नसल्याने दुरुस्ती झालेली नाही. प्रकल्पांची पाणीगळती वेळीच न रोखल्यास संबंधित प्रकल्प पूर्णक्षमतेने भरूनही भविष्यात ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागेल !जिल्हाभरातील बहुतांश पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव १९७०-७२ च्या कालावधीत बांधण्यात आले आहेत. मजुरांची गरज लक्षात घेऊन ही कामे करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांच्या बाबतीत तांत्रिक घटक फारसे पाहिलेले नाहीत. दरम्यान, प्रकल्प उभारल्यानंतर किमान दर दहा वर्षांनी त्याची डागडुजी करणे अपेक्षित असते. यामध्ये प्रकल्पाच्या पायातून होणारी गळती थांबविणे, खचलेल्या सांडव्यांची दुरुस्ती करणे, चिबड चारी दुरुस्त करणे आदी कामे करणे अपेक्षित असते. परंतु, मागील ३५ ते ४० वर्षांच्या कालावधीत या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले गेले. दुरुस्तीसाठी छदामही मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे हे प्रकल्प कोरडेठाक होते. हे प्रकल्प दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ होती. परंतु, तसे झाले नाही. दरम्यान, जिल्ह्यात यंदा परतीच्या पवासाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे विशेषत: पाझर तलाव, सिंचन तलाव, गाव तलाव तुडूंब भरले. परंतु, सव्वादोनशेवर प्रकल्प गळके असल्याने पाणी वाया जात आहे. सदरील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला असता, तर हे प्रकल्प आज सुस्थितीत राहिले असते. आणि पाणीही वाया गेले नसते, अशी प्रतिक्रीया संबंधित धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांतून उमटू लागली आहे.