मागच्या काही वर्षांत औरंगाबाद आणि संबंध मराठवाड्यात वडाच्या झाडांची मोठ्या प्रमाणत तोड झाली आहे. त्याच्या बदल्यात लागलेल्या वडाचे प्रमाण नाममात्र आहे. वडाच्या झाडाचे पर्यावरणात असलेले महत्त्व आणि त्यावर असणारी जैवविविधता ही फार मोठी आहे. औरंगाबाद आणि संबंध मराठवाड्याच्या सुदृढ पर्यावणाकरिता जास्तीत जास्त वड लावून त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून जनसहयोग संस्थेने २४ जूनला वट सावित्री पौर्णिमेनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पडेगाव येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत २२१ वटवृक्षांचे (वडाच्या) रोपण आणि माता भगिनींच्या हस्ते २२१ वटवृक्षांचे पूजन करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात भाग घ्यावा असे आवाहन जनसहयोग संस्थेचे प्रशांत गिरे, संदीप जगधने, किशोर कासार, शाम जेपल्लीकर, आदींनी केले आहे.
वट सावित्रीनिमित्त आज २२१ वटवृक्षांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST