शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

बावीस वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात रुजलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST

................. स. सो. खंडाळकर औरंगाबाद : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद जिल्ह्यात तशी ...

.................

स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद जिल्ह्यात तशी रुजलीच नाही. आज जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आलेला ना खासदार आहे ना एखादा आमदार...! अर्थात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण व शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे हे सतत तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची व समाधानाची बाजू.

एकेकाळी एस काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार यांना मराठवाड्याने भरभरून यश दिले. मात्र, असे यश नंतरच्या काळात मिळवता आले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत पैठणमधून एकदा संजय वाघचौरे व वैजापूरमधून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. सध्या राष्ट्रवादीच्या जि. प. सदस्यांची संख्या अवघी दोन आहे. औरंगाबाद महापालिकेत मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी म्हणजे चार किंवा पाच होती. स्वाती कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली कन्नडची नगर परिषद मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून सुधाकर सोनवणे यांनी काम पाहिले. नंतर पुन्हा एकदा त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पहिल्या जिल्हाध्यक्षा म्हणून छाया जंगले पाटील यांनी काम केले. सध्याही त्या या पदावर काम करीत आहेत.

प्रा. किशोर पाटील यांना दोनदा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. दिवंगत कैलास पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली. सध्या गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत; परंतु कोरोनाचे संकट सुरू झाले आणि त्यांना औरंगाबाद जिल्ह्यासाठी व इथल्या राष्ट्रवादीसाठी वेळ देता आलेला नाही.

इंदिरा काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय या पक्षांचे मोठे नेते आले की, कार्यकर्ते गर्दी करतात. गटबाजी होते. नेते गेले की पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था असते.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावा तसा जनाधार मिळवता आलेला नाही. आज महाविकास आघाडीत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याचा फायदा औरंगाबाद जिल्ह्यात या पक्षाला होणार का, आगामी निवडणुकांमध्ये युवकांना खरोखरच मोठी संधी उपलब्ध करून देणार का, महापालिका निवडणुकीत दोन आकड्यांचा विजय प्राप्त करणार का, ही सारी आव्हाने जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहेत.