शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धरणांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST

परभणी : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिके अडचणीत सापडली आहेत़ तर दुसरीकडे ७ धरणांत केवळ २१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढू लागली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिके अडचणीत सापडली आहेत़ तर दुसरीकडे ७ धरणांत केवळ २१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढू लागली आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मुख्य प्रकल्प असून, त्याचबरोबर गोदावरी नदीवरील ४ बंधारे आणि दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होतो़ दरवर्षी पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर यातील पाणी उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी वापरले जाते़ यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़ परंतु, पाऊस गायब झाल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे़ येलदरी धरणामध्ये केवळ ३ टक्के साठा झाला आहे तर निम्न दुधना प्रकल्पात ३९़८३ टक्के, झरी प्रकल्पामध्ये ३० टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात २४ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पात १६ टक्के साठा उपलब्ध आहे़ डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात केवळ ४़५ टक्के साठा उपलब्ध असून, पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यात तर पाणीच शिल्लक नाही़ यावर्षीच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन दिवस पाऊस झाला़ परंतु, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली आहे़ त्यामुळे धरणातील पाणी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे़ एकीकडे पावसाअभावी पिके धोक्यात आहेत तर दुसरीकडे धरणांमध्ये पाणीसाठा नसल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीच गंभीर होण्याची चिन्हे आहेत़