शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

२१ गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST

कळमनुरी : तालुक्यात ३० आॅगस्टपासून पावसाची संततधार सुरू असून ३१ आॅगस्ट रोजीही पाऊस सुरू होता. या पावसामुळे कयाधू नदीची पातळी वाढली आहे.

कळमनुरी : तालुक्यात ३० आॅगस्टपासून पावसाची संततधार सुरू असून ३१ आॅगस्ट रोजीही पाऊस सुरू होता. या पावसामुळे कयाधू नदीची पातळी वाढली आहे. या नदीकाठच्या २१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी दिली. कळमनुरी तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. या हंगामात प्रथमच एवढा मोठा पाऊस पडत आहे. यामुळे जलपातळी वाढली आहे. छोटे नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. ३० आॅगस्ट रोजी ७७.१७ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत ३०४.९९ मि.मी. पाऊस पडला आहे. या पावसाने कयाधू नदीला बऱ्यापैकी पाणी आले आहे. संततधार पाऊस उद्यापर्यंत सुरूच राहिला तर कयाधू नदीकाठच्या नागरिकांना अन्य ठिकाणी हलवावे लागणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी तहसीलदार चिकुर्ते यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पाहणी केली व सतर्कतेचा इशाराही दिला आहे. तहसीलदारांनी बिबथर, नांदापूर, हरवाडी, रूपूर, सावंगी भू., सोडेगाव, चाफनाथ, सालेगाव, डोंगरगाव नाका, गंगापूर, कोंढूर, डिग्रस, शेवाळा, देवजना, येगाव, सापळी, येलकी, डोंगरगावपूल, चिखली, फुटाणा, कान्हेगाव या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. कयाधू नदीला पूर आला ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी असलेले समाजमंदिर, शाळा अशा ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. कयाधू नदीच्या पाणी पातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवकांना नजर ठेवून ग्रामस्थांना सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामस्थांनी काही अडचणी आल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासन कयाधू नदीच्या पाणी पातळीवर नजर ठेवून असल्याचेही तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. े(वार्ताहर)