शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

२०८० आकस्मित भेटींनी जिल्हा परिषद शाळांवर अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:03 IST

औरंगाबाद : मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. ग्रामीण भागातील शाळा कसे काम ...

औरंगाबाद : मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. ग्रामीण भागातील शाळा कसे काम करत आहेत. त्याचा धांडोळा घेण्यासाठी जिल्हा परिषेदेच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना २०१८ आकस्मित भेटी आजपर्यंत दिल्या. त्यामुळे शाळांकडून शासन निर्देशांचे पालन योग्य पद्धतीने करून घेत त्यांच्यावर एकप्रकारे अंकुश राहिल्याची माहिती शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.

औरंगाबाद २५२, पैठण २८३, गंगापूर २२८, वैजापूर ३४८, कन्नड २९५, खुलताबाद १५५, फुलंब्री १८८, सिल्लोड २४२, सोयगांव १९० अशा २१८० आकस्मित भेटी अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि विषय तज्ज्ञांनी इयत्ता पहिली ते १२ पर्यंतच्या शाळांना भेटी दिल्या. शिक्षकसंख्या, विद्यार्थी उपस्थिती, आरटीपीसीआर तपासणी केलेली व राहिलेली शिक्षकसंख्या, पटसंख्या व उपस्थित विद्यार्थीसंख्या, विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना, शाळेने निश्चित केलेली वेळ, शिक्षकनिहाय व विषयनिहाय वेळापत्रक, पालकांची अनुमती, शिक्षकांचे कार्यगट, शाळेने केलेली उल्लेखनीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील उपस्थिती वाढली. असल्याचे शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सांगितले.