शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

जि.प.चे २० गुरुजी गायब

By admin | Updated: October 9, 2016 01:07 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जवळपास वीस शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून गायब आहेत. मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक बदल्यानंतर ते शिक्षक बदली

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जवळपास वीस शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून गायब आहेत. मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक बदल्यानंतर ते शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी शाळेवर हजर न होणाऱ्या अशा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. तेव्हा गैरसोयीच्या शाळांत बदली झाल्यामुळे काही शिक्षक सोयीच्या शाळांमध्ये पदस्थापना मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे जवळपास २० शिक्षक नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून बदली झालेल्या शाळांत रुजूच झालेले नाहीत. परिणामी, अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शिक्षण सभापती विनोद तांबे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी शिक्षक देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात सभापती विनोद तांबे यांनी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडून शिक्षकांबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा गैरसोय होत असल्यामुळे बदली झालेले शिक्षक शाळेवर रुजू झालेले नसल्याचे समजले. ते सर्व शिक्षक सोयीच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. बदली झाल्यानंतरही बेकायदेशीरपणे गैरहजर असलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्दड यांच्याकडे पालक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार अर्दड यांनी त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आठवडाभराचा कालावधी लोटला; पण अद्यापपर्यंत एकाही शिक्षकाविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष!