शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

२८ दिवसांत २० कोटींचे नुकसान!

By admin | Updated: March 31, 2016 00:24 IST

जालना : केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कर (एक्साईज ड्युटी) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील

जालना : केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कर (एक्साईज ड्युटी) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त सराफा व्यावसायिक सहभाग झाले आहेत. २८ दिवसांत तब्बल २० कोटी रूपयांचे नुकसान आणि दोनशे कारागिरांची उपासमार सुरू झाली आहे. सराफांच्या उपोषणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुध्दा पाठिंबा दिल्याची माहिती जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने यांनी दिली.तीन दिवस पुकारलेल्या बंदच्या काळात केंद्र सरकारकडून कुठलीच चर्चा करण्यात येत नसल्याने अनिश्चित काळासाठी बंद पुकारण्यात आला आहे. २ मार्चपासून सुरू झालेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांचे २० कोटीपेंक्षा जास्त रूपयांचा फटका बसला असल्याचे दुसाने यांनी दिली. सोन्याचे दागिने घडविणाऱ्या तसेच त्याची खरेदी-विक्री करणाऱ्या सराफांकडून एक टक्का अबकारी कर (एक्साईज ड्युटी) आकारण्याचा निर्णय केंद्र सरकाने यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केला. सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना ही अट जाचक ठरणारी आहे. या क्षेत्रातील ८० टक्के व्यावसायिकांना अबकारी कर भरणे अवघड असल्याचे दुसाने म्हणाले. राज्य सराफा असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद राका यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या बंदबाबत चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली. सराफांच्या बंदला शिवसेना पाठिंबा देणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी राका यांना दिली असल्याची माहिती दुसाने यांनी दिली. सराफांच्या या बंदचा काहीतरी तोडगा निघावा, यासाठी जिल्ह्यातील सराफांची स्वाक्षरी मोहीम राबवून ते पत्र दोन ते तीन दिवसांत पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांना देणार असल्याचे दुसाने म्हणाले.सराफा व्यावसायिकांनी कारागिरांचे वहिखाते अद्ययावत ठेवणे, किती सोने आले, कोठून आले याची नोंद ठेवणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्यांच्या नोंदी अपडेट नसल्यास ७ वर्षांची शिक्षा आणि नसल्यास २५ लाखांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. ही अट जाचक आहे. यामध्ये मोठ्या व्यावसायिकापेंक्षा छोटे सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील सोन्या चांदीचे मोठे सरफा आपआपली दुकाने उघडण्यासाठी घाई करत आहेत. कारण मोठे व्यावसायिक त्यांच्याकडे दागिने तयार करण्याचे दाखवून अबकारी करापासून त्यांना म्हणावा तसा फटका बसणार नाही. केंद्र शासनाने याचा विचार करून लावण्यात आलेल्या अटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी आमची मागणी आहे. - महेश दुसाने अध्यक्ष, जिल्हा सराफा असोसिएशन जालना