शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

२ हजार कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात !

By admin | Updated: January 4, 2016 00:06 IST

लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी

लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी वेतनवाढीसाठी गेल्या महिन्यात दोन दिवस संप पुकारुन ही सेवा विस्कळीत केली होती़ त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पाचही आगारातील २ हजार वाहक-चालकांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे वाहक-चालक हादरले असून, संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तशा नोटिसाही पाठविल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत़ लातूर, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या पाच आगाराचा त्यात समावेश आहे़ या आगारातील १ हजार वाहक व १ हजार चालक डिसेंबर महिन्यात पगारवाढीसाठी १७ व १८ तारखेला संपावर होते़ या कर्मचाऱ्यांनी एकही बस आगारातून बाहेर पडू दिली नव्हती़ त्यामुळे एसटीचे ६८ लाखांचे नुकसान झाले होते़ पूर्ण प्रवासी यंत्रणा विस्कळीत झाली होती़ चालक-वाहकांनी दोन दिवस आगारातच मुक्काम ठोकून बस हालू दिली नव्हती़ त्यामुळे हे नुकसान झाले होते़ दरम्यान, प्रशासनाने पगारवाढीचे आश्वासन दिल्यानंतर बस सेवा सुरळीत झाली़ त्यानंतर आता एसटी प्रशासनाने संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ संपातील कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयांतर्गत २ हजार वाहक-चालक या संपामध्ये सामिल झाले होते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्यावश्यक सेवा असल्याच्या सूचना देऊनही वेतनाच्या मागणीसह इतर मागणीसाठी दोन दिवस संप करण्यात आला़ या दोन दिवसासाठी १६ दिवसांचा पगार कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयानुसार लातूर विभागातील २ हजार वाहक-चालकांचे २१ कोटी रुपये कपात होतील़ या सर्व कर्मचाऱ्यांना लातूरच्या विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ ४कामगार संघटनेने पूर्वकल्पना न देता आंदोलन करुन दोन दिवस प्रवाशांना वेठीस धरले़ त्यामुळे एसटी महामंडळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ शिवाय, एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते़ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही़ याची माहिती असताना देखील वाहक-चालकांनी संप केला़ त्यामुळे शासनाने वेतन कपातीची कारवाई सुरु केली आहे, असे विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़ या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ हजार कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले़