शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

२ हजार कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात !

By admin | Updated: January 4, 2016 00:06 IST

लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी

लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी वेतनवाढीसाठी गेल्या महिन्यात दोन दिवस संप पुकारुन ही सेवा विस्कळीत केली होती़ त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पाचही आगारातील २ हजार वाहक-चालकांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे वाहक-चालक हादरले असून, संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तशा नोटिसाही पाठविल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत़ लातूर, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या पाच आगाराचा त्यात समावेश आहे़ या आगारातील १ हजार वाहक व १ हजार चालक डिसेंबर महिन्यात पगारवाढीसाठी १७ व १८ तारखेला संपावर होते़ या कर्मचाऱ्यांनी एकही बस आगारातून बाहेर पडू दिली नव्हती़ त्यामुळे एसटीचे ६८ लाखांचे नुकसान झाले होते़ पूर्ण प्रवासी यंत्रणा विस्कळीत झाली होती़ चालक-वाहकांनी दोन दिवस आगारातच मुक्काम ठोकून बस हालू दिली नव्हती़ त्यामुळे हे नुकसान झाले होते़ दरम्यान, प्रशासनाने पगारवाढीचे आश्वासन दिल्यानंतर बस सेवा सुरळीत झाली़ त्यानंतर आता एसटी प्रशासनाने संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ संपातील कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयांतर्गत २ हजार वाहक-चालक या संपामध्ये सामिल झाले होते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्यावश्यक सेवा असल्याच्या सूचना देऊनही वेतनाच्या मागणीसह इतर मागणीसाठी दोन दिवस संप करण्यात आला़ या दोन दिवसासाठी १६ दिवसांचा पगार कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयानुसार लातूर विभागातील २ हजार वाहक-चालकांचे २१ कोटी रुपये कपात होतील़ या सर्व कर्मचाऱ्यांना लातूरच्या विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ ४कामगार संघटनेने पूर्वकल्पना न देता आंदोलन करुन दोन दिवस प्रवाशांना वेठीस धरले़ त्यामुळे एसटी महामंडळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ शिवाय, एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते़ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही़ याची माहिती असताना देखील वाहक-चालकांनी संप केला़ त्यामुळे शासनाने वेतन कपातीची कारवाई सुरु केली आहे, असे विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़ या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ हजार कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले़