शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २ संच सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:38 IST

नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मे.वॅ. क्षमतेचे 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून बंद होते या 3 संचा पैकी दोन संच चालू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनविन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मे.वॅ. क्षमतेचे 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून बंद होतेसंच क्र. 7 हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. संच क्र. 6 हा बुधवारी चालू करून राञीच्या वेळी त्यातून वीज निर्मिती सुरू होईल

ऑनलाईन लोकमत / संजय खाकरे

परळी (बीड ), दि ८ :   नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मे.वॅ. क्षमतेचे 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून बंद होते या 3 संचा पैकी दोन संच चालू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी 250 मे.वॅ. क्षमतेच्या संच क्र. 7 हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. या संचातून बुधवारी पहाटे पासून प्रत्यक्षात वीज निर्मितीस प्रारंभ होणार आहे. तर 250 मे. वॅ. क्षमतेच्या संच क्र. 6 हा बुधवारी चालू करून राञीच्या वेळी त्यातून वीज निर्मिती सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न येथील स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहेत. त्यामुळे हे दोन्ही संच बुधवार पासून सुरू होणार असल्याची माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.  

गेल्या 2 महिन्यांपासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील व नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने परळीच्या व्यापार पेठेवर परिणाम जाणवला आहे. मार्केटमधील उलाढाल मंदावली आहे. कंञाटदार व खासगी कामगारांना कामच नसल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक कामगार कामासाठी परळी सोडून गेले. राज्यातील वीज निर्मिती वाढून वापर कमी झाल्याने अनेक ठिकाणचे संच बंद करण्याचा निर्णय शासनाच्या ऊर्जा विभागाने घेतला होता. त्यात नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच तर जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 2 संच बंद ठेवले होते. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच तर गेल्या 2 वर्षापासून बंद आहेत. 

परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,  नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून वीज निर्मितीचा खर्च परवडत नसल्याने  शासनाच्या आदेशानुसार बंद केले होते. यापैकी 2 संच सुरू करण्याच्या हालचाली मंगळवार पासून चालू झाल्या आहेत. या 2 ही संचातून प्रत्यक्षात बुधवार पासून वीज निर्मिती पुन्हा सुरू होईल. शासनाच्या ऊर्जा विभागाच्या सुचना मिळाल्यानंतर हे दोन्ही संच सुरू करण्यात येत आहेत. 

माजी मंञी पंडीतराव दौंड म्हणाले की, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करावेत यासाठी आपण संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही ऊर्जामंञी बावन्नकुळे यांची भेट घेवून परळीचे सर्व संच सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे यांनी ही परळीचे संच सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकमतने ही या संदर्भात वेळोवेळी बातम्या प्रकाशीत करून लोकप्रतिनिधींचे व विद्युत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 2 संच सुरू होत असले तरी जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील 2 वर्षापासून बंद असलेले संच सुरू करण्याच्या बाबतीत अद्याप ही काही निर्णय झालेला नसल्याचे समजते.