शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गारपीटग्रस्तांसाठी १८१ कोटींची मदत

By admin | Updated: May 24, 2014 01:40 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेत पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले त्यांना

जालना : जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेत पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले त्यांना राज्य शासनातर्फे जाहीर झालेल्या विशेष पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी यापूर्वी ९५ कोटी आणि दि. १३ मे २०१४ रोजी ८६ कोटी अशी एकूण १८१ कोटी रुपयांची मदत उपलब्ध झाली आहे. या मदतीचे वाटप शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यावर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी येथे आज दिली. शेती व फळ पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीस प्रचलित दरानुसार ४ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम ५ हजार ५०० रुपये हेक्टर अशी एकूण १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ओलिताखाली शेतीस ९ हजार प्रति हेक्टर या व्यतिरिक्त विशेष रक्कम ६ हजार रुपये प्रती हेक्टर अशी एकूण १५ हजार रुपये आणि फळ पिकांसाठी १२ हजार रुपये प्रति हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम १३ हजार रुपये प्रति हेक्टर अशी एकूण २५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या बॅँक बचत खात्यात थेट जमा करण्यात यावी, ज्या बाधित शेतकर्‍यांचे बॅँकेत बचत खाते नसेल त्यांचे झिरो बॅलन्स खाते उघडून त्यांच्या खात्यामध्ये मदत रक्कम जमा करण्यात यावी, कोणत्याही बाधित शेतकर्‍यांस रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत करण्यात येऊ नये तसेच मदतीची रक्कम बाधित शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यावर थेट जमा करतांना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बॅँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करु नये, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी सर्व तहसीलदार यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त मदतीची रक्कम आणि बाधित शेतकर्‍यांना वितरित करण्यात आलेल्या रकमांची जिल्हाधिकार्‍यांनी माहिती घेतली.