शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कवितेच्या पाडव्याला १८ वर्षांची परंपरा!

By admin | Updated: April 7, 2016 00:18 IST

जालना : कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट व ‘उर्मी’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या कवितेचा पाडवा कार्यक्रमाला अठरा वर्षांची परंपरा लाभली आहे.

जालना : कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट व ‘उर्मी’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या कवितेचा पाडवा कार्यक्रमाला अठरा वर्षांची परंपरा लाभली आहे. याच कार्यक्रमात प्रसिद्ध उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी दु:खी राज्य काव्य पुरस्काराचे वितरण केले जाते. राज्यातील अठरा मान्यवरांना आतापर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरावर दिला जाणाऱ्या या पुरस्काराला वलय प्राप्त झाल्याने याचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित होते. व्यापारी शहर असलेल्या जालन्यात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ गतीमान व्हावी, या उद्देशाने उर्मीचे संपादक तथा ज्येष्ठ कवि जयराम खेडेकर, कार्यकारी संपादक डॉ. संजीवनी तडेगावकर, कै. नंदकुमार साहनी चॅरिटेबल ट्रस्टचे नवल साहनी आणि विनीत साहनी यांनी १९९८ मध्ये कवितेचा पाडवा सुरु केला. तो आजतागायत अव्याहतपणे सुरुच आहे. या कार्यक्रमामुळे चैतन्यमय वातावरण निर्मिती तसेच नवीकवींना प्रोत्साहन मिळाले आहे. एकूणच कवितेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा यानिमित्ताने सुरु झाली आहे. गत अठरा वर्षांमध्ये पुरुषोत्तम पाटील, गजमल माळी, ना.धों. महानोर, गंगाधर पानतावणे, विठ्ठल वाघ, विजया राजाध्यक्ष, भालचंद्र नेमाडे, वसंत आबाजी डहाके, राजन गवस, गो.मा. पवार, प्रभाकर बागले, ना.धों. महानोर, उत्तम कांबळे, सतीश काळसेकर, भगवान देशमुख, सदानंद देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रमोहन कुलकर्णी या मान्यवरांनी कवितेचा पाडवा कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे. कवी आणि कवितेच्या सन्मानासाठी १८ वर्षांपासून कवितेचा पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. (प्रतिनिधी)