शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

१५ दिवसांत १८ वरून रुग्णसंख्या २४६ वर, नियमांचे पालन आता तरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पंधरा दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या १८ होती, ती आता २४६ वर पोहचली असून, तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. वाढती ...

औरंगाबाद : पंधरा दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या १८ होती, ती आता २४६ वर पोहचली असून, तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून दक्ष राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केले.

सिडको येथील प्रियदर्शनी उद्यानात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर पाण्डेय म्हणाले की, शहरात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शाळा, महाविद्यालये बंद केले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन आरोग्य पथक तपासण्या करीत आहे. मास्क वापरण्यावर अधिक भर दिला असून, कडक कारवाई होत आहे. दररोज मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या नियमांचे पालन केले तर शहरात कोरोना आटोक्यात येईल.

रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गरजेनुसार कोविड सेंटरची संख्या वाढवली जाईल. मागच्या वर्षी कोविडच्या काळात आलेले अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन केले आहे. मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभा केला जात आहे. महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.