शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

१६५९ जागा रिकाम्याच

By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ३७७ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आणखी १ हजार ६५९ जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाला नोंदणीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४३५ विनाअनुदानित शाळांमध्ये जवळपास ५ हजार ३६ जागांवर ‘आरटीई’नुसार प्रवेश दिले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्य मंडळाबरोबरच ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’, ‘आयबी’ अशा सर्व मंडळांच्या तसेच सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटक व अपंगांसाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान, सुरुवातीला शाळांसाठी आणि त्यानंतर पालकांसाठी आॅनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, यासंबंधीचे ‘पोर्टल’ सतत ‘हँग’ होत राहिल्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली. त्यानंतर अलीकडे पालकांसाठी नोंदणी सुरू झाली. त्यानंतर ५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत ‘आरटीई’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिला असला तरी अनेक शाळांनी पळवाटा शोधल्या आहेत. जेव्हा पालक आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जातो, त्यावेळी ‘पोर्टल’वर अपेक्षित शाळा दिसत नसल्याने नाईलाजाने पालकांना स्क्रीनवर दिसणाऱ्या शाळेला प्राधान्य देण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.