शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

१ जानेवारीपासून १४ वा वित्त आयोग

By admin | Updated: December 30, 2015 00:48 IST

औरंगाबाद : ग्रामपंचायत स्तरावर विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने वित्त आयोगाच्या माध्यमातून भरघोस निधीचा पुरवठा केला असून, तेरावा वित्त आयोग ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे.

औरंगाबाद : ग्रामपंचायत स्तरावर विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने वित्त आयोगाच्या माध्यमातून भरघोस निधीचा पुरवठा केला असून, तेरावा वित्त आयोग ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. १ जानेवारीपासून १४ वा वित्त आयोग लागू होत असून, या आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्हा परिषदेकडे ५४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना संनियंत्रणासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेमार्फत हा निधी थेट संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांच्या खात्यावर जमा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी ठरवून दिलेल्या निकषानुसार कामांची यादी ५ जानेवारीपर्यंत तालुकास्तरीय समितीकडे पाठविणे बंधनकारक आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करून ती यादी १५ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतीकडे पाठविल्यानंतर २६ जानेवारीपर्यंत कामांच्या यादीला ग्रामसभेची मान्यता घेणे गरजेचे आहे. सध्या १४ व्या वित्त आयोगाचा निधीचा पहिला हप्ता म्हणून दोन टप्प्यांमध्ये ५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रामुख्याने ग्रामपंचायत भवन, फर्निचर किंवा भवनच्या विस्ताराची कामे करता येतील. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, घनकचरा व्यवस्थापनासंबंधी कचरा गोळा करण्याची साधनसामुग्री, लहान ट्रॅक्टर, ट्रॉली खरेदी करता येईल, मच्छरमुक्त गाव करण्यासाठी शोषखड्डे घेता येतील, पाणीपुरवठ्यांच्या स्रोतांचा विकास करता येईल, नळांना मीटर खरेदी करता येतील, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्ती आदी कामे करता येणार आहेत.