शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

१३०० विद्यार्थ्यांना मिळणार संस्था शुल्क परत

By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST

राजकुमार जोंधळे , लातूर राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक दर्जेदार प्रशिक्षण देता यावे, यामुळे साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांकडूनच निधी उभारण्याचा प्रयत्न

राजकुमार जोंधळे , लातूरराज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक दर्जेदार प्रशिक्षण देता यावे, यामुळे साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांकडूनच निधी उभारण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. मात्र विविध विद्यार्थी संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर हे शुल्क आता त्या-त्या विद्यार्थ्यांना परत देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक ५ नोव्हेंबर रोजी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने जारी करण्यात आला आहे. परिणामी राज्यभरातील तब्बल ९० हजार तर लातूर जिल्ह्यातील १३०० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हे शुल्क जमा केले जाणार आहे. राज्यभरातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून हे शुल्क सक्तिने वसूल करण्यात आले होते.लातूर जिल्ह्यात १० शासकीय, ४ निमशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या १४ संस्थामध्ये तब्बल १३०० विद्यार्थी विविध विद्याशाखेत औद्योगिक प्रशिक्षण घेतात. प्रारंभी विद्यार्थ्यांकडून संस्था विकास शुल्क हे स्विकारण्यात येते. हे शुल्क विविध विद्याशाखेनुसार वेगवेगळे आहे. किमान तीन ते चार हजारांपर्यंत हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले जाते. प्रारंभी हे शुल्क ३६० रुपये होते, मात्र हा आकडा दिवसेंदिवस वाढत आता तो चार हजारांच्या घरात गेला आहे. लातूर जिल्ह्यासह राज्याच्या कांही भागात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ आहे. अशा दुष्काळातही सरकारकडून अधिक दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी साहित्य खरेदीच्या नावाखाली हे शुल्क वसूल करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल ९० हजार विद्यार्थ्यांचे कोट्यवधी शुल्क संबंधित संस्थांनी वसूल केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शासनाच्यावतीने साहित्य पुरवठा करण्यात यावा, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विविध विद्यार्थी संघटनांचे जूनपासून आंदोलन सुरु होते. अखेर विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनापुढे सरकारने नमते घेत, यावर चर्चा घडवून आणली. नाव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालय स्तरावर झालेल्या चर्चेतून आणि समितीने दिलेल्या अहवालातून हे शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक ५ नोव्हेंबर रोजी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. हे शुल्क विद्यार्थ्यांना त्या-त्या संस्थांनी तातडीने परत करावेत असे या परिपत्रकात म्हटले आहे. शुल्क माफ झाल्याने आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.