कोळगाव: गेवराई तालुक्यातील उकडप्रिंपी येथे एका घरावर उपविभागीय पोलीस अधीक्षक गौरव सिंह व त्यांच्या पथकाने शनिवारी धाड टाकून बारा लाख रुपयांचे चंदन जप्त करुन तीन तस्करांना ताब्यात घेतले.विष्णु साहेबराव बांगर, अतुल धर्मराज तारकुटे (दोघे रा. उक्कड पिंप्री, रा. गेवराई) व अनिल भानुदास खरात (रा. शिरापूर, ता. शिरुर कासार) अशी आरेपींची नावे आहेत. उक्कड प्रिंपी येथे एका घरात चंदन लपवून ठेवल्याची माहिती उपपोअ गौरव सिंह यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह चकलंबा पोलिसांनी धाड मारुन अडीच ते तीन क्विंटल अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे चंदन ,वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरुद्ध चकलंबा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कावारई गौरवसिंह यांच्यासह चकलंबा पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप तेजनकर, पोकॉ उगलमुगले, पवार, मोरे, नागरे, राऊत यांनी केली. गेवराई तालुक्यातील काजळा येथील वीस एकरात गांजाची झाडे जप्त केल्यानंतर आता उक्कड पिंप्री येथे एका घरावर छापा मारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरलेले चंदन पॅकिंगद्वारे इतरत्र पाठविले जात होत. हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु असल्याचेही समजते. (वार्ताहर)
बारा लाखांचे चंदन जप्त
By admin | Updated: December 13, 2014 23:40 IST